शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

अत्रे कट्ट्याच्या उपक्रमाचा अ‍ॅप हवा

By admin | Updated: May 17, 2016 03:54 IST

तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे.

ठाणे : तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे. म्हणजेच, त्यांच्या खिशातून हृदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. अत्रे कट्ट्यासारख्या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती करा, असा सल्ला डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू संजय ओक यांनी दिला. रविवारी गडकरी रंगायतन येथे अत्रे कट्ट्याचा १५ वा वर्धापन दिन साजरा झाला. या वेळी बोलताना ओक यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी लिहू शकत नाही; पण टेक्सटिंग करते. बोलू शकत नाही, पण ब्लॉकिंग करते. त्यामुळे अ‍ॅपची निर्मिती केल्यास त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.अत्रे कट्ट्याने चालू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच आता स्वत:चे हक्काचे सभागृह घ्यावे, म्हणजे असे अनेक चांगले कार्यक्रम त्यांना करता येतील आणि रसिक ठाणेकरांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल, असे सांगून आ. प्रताप सरनाईक यांनी त्यांना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले. व्यासपीठावर आ. प्रताप सरनाईक, संपदा वागळे, विदुला ठुसे, शीला वागळे, अनंत मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनुजा वर्तक यांचा ‘हृदयी प्रीत जागते’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात निलेश निरगुडकर यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने केली. त्यानंतर, कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘हृदयी प्रीत जागते, जाणता न जाणता’, हे गाणे सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आचार्य अत्रे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक आवडायचे. विशेष म्हणजे याच नाटकातील ‘मजवरी तयाचे प्रेम खरे’ हे पद त्यांना अधिक आवडे, अशी निवेदिका दीपाली केळकर यांनी त्यांची आठवण सांगितली. त्यानंतर, कश्मिरा राईलकर यांनी आपल्या सुंदर आवाजातून हे पद सादर केले. सासू आणि सुनेचे नाते आता बदलले असल्याचे निवेदिका केळकर यांनी नमूद करताच गायिका वर्तक यांनी ‘मुली तू आलीस आपल्या घरी’ हे गाणे सादर केले. गायिका राईलकर आणि गायक निरगुडकर यांनी ‘धुंदीत राहू मस्तीत गाऊ’ हे गाणे सादर केले. त्यानंतर ‘भरजरी गं पितांबर दिला आणून द्रौपदीस बंधू शोभे नारायण’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांचा माळा’, ‘काय सांगू शेणी बाई माझा माहेरचा थाट’, ‘राधा कृष्णावर भाळली’, ‘ऐन दुपारी यमुनातीरी’ अशी अनेक गाणी सादर करण्यात आली. मयूरेश शेर्लेकरच्या ढोलकीवादनाने कार्यक्रमाची रंगत वाढली.