शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

अत्रे कट्ट्याच्या उपक्रमाचा अ‍ॅप हवा

By admin | Updated: May 17, 2016 03:54 IST

तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे.

ठाणे : तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे. म्हणजेच, त्यांच्या खिशातून हृदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. अत्रे कट्ट्यासारख्या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती करा, असा सल्ला डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू संजय ओक यांनी दिला. रविवारी गडकरी रंगायतन येथे अत्रे कट्ट्याचा १५ वा वर्धापन दिन साजरा झाला. या वेळी बोलताना ओक यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी लिहू शकत नाही; पण टेक्सटिंग करते. बोलू शकत नाही, पण ब्लॉकिंग करते. त्यामुळे अ‍ॅपची निर्मिती केल्यास त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.अत्रे कट्ट्याने चालू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच आता स्वत:चे हक्काचे सभागृह घ्यावे, म्हणजे असे अनेक चांगले कार्यक्रम त्यांना करता येतील आणि रसिक ठाणेकरांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल, असे सांगून आ. प्रताप सरनाईक यांनी त्यांना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले. व्यासपीठावर आ. प्रताप सरनाईक, संपदा वागळे, विदुला ठुसे, शीला वागळे, अनंत मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनुजा वर्तक यांचा ‘हृदयी प्रीत जागते’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात निलेश निरगुडकर यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने केली. त्यानंतर, कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘हृदयी प्रीत जागते, जाणता न जाणता’, हे गाणे सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आचार्य अत्रे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक आवडायचे. विशेष म्हणजे याच नाटकातील ‘मजवरी तयाचे प्रेम खरे’ हे पद त्यांना अधिक आवडे, अशी निवेदिका दीपाली केळकर यांनी त्यांची आठवण सांगितली. त्यानंतर, कश्मिरा राईलकर यांनी आपल्या सुंदर आवाजातून हे पद सादर केले. सासू आणि सुनेचे नाते आता बदलले असल्याचे निवेदिका केळकर यांनी नमूद करताच गायिका वर्तक यांनी ‘मुली तू आलीस आपल्या घरी’ हे गाणे सादर केले. गायिका राईलकर आणि गायक निरगुडकर यांनी ‘धुंदीत राहू मस्तीत गाऊ’ हे गाणे सादर केले. त्यानंतर ‘भरजरी गं पितांबर दिला आणून द्रौपदीस बंधू शोभे नारायण’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांचा माळा’, ‘काय सांगू शेणी बाई माझा माहेरचा थाट’, ‘राधा कृष्णावर भाळली’, ‘ऐन दुपारी यमुनातीरी’ अशी अनेक गाणी सादर करण्यात आली. मयूरेश शेर्लेकरच्या ढोलकीवादनाने कार्यक्रमाची रंगत वाढली.