शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अ‍ॅप आधारित टॅक्सी आवश्यक

By admin | Updated: July 1, 2017 03:14 IST

ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सामान्यांसाठी आवश्यक आहेत. या टॅक्सींचे भाडे निश्चित करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सामान्यांसाठी आवश्यक आहेत. या टॅक्सींचे भाडे निश्चित करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने जनहित लक्षात घ्यावे, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी अ‍ॅप आधारित टॅक्सी चालकांनी व उबरने केलेल्या याचिकेवरील सुनावणीत म्हटले. दरम्यान, दरनिश्चिती समितीने अहवाल सादर केल्याशिवाय ओला, उबरच्या टॅक्सींवर कारवाई न करण्याचे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले.महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजनेविरुद्ध उबर व सहा चालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील जे. डब्ल्यू. मॅट्टोस यांनी काळ्या-पिवळ्या टॅक्सींसह अ‍ॅप आधारित टॅक्सींचे भाडे निश्चित करण्यासाठी दरनिश्चिती समिती नेमण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘समितीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. अहवाल मिळेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही,’ असे मॅट्टोस यांनी न्यायालयाला सांगितले.उबरचे जाळे संपूर्ण जगभरात पसरले असून त्यांची सेवा चांगली आहे. ग्राहकांचे हित पाहता हा विषय गंभीर आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने विचार करावा. ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सामान्यांसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे या टॅक्सींना बंदी घालू नका. तसे केलेत तर स्पर्धा थांबेल आणि पुन्हा काळ्या-पिवळ्यांच्या जमान्यात जाऊ, असे न्यायालयाने म्हटले.आम्हालाही ग्राहकांची आणि त्यांच्या हिताची चिंता आहे. सर्व ग्राहक, जे करदाते आहेत त्यांच्यावरही याचा परिणाम होईल. आम्हाला सांगा किती काळ्या-पिवळ्या टॅक्सी कमी अंतरावर जाण्यास तयार होतील? त्या सर्वांना दूरचे भाडे हवे असते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आॅल इंडिया रेडिओ टॅक्सी आॅपरेटर्स असोसिएशनला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ३ आॅगस्ट रोजी ठेवत राज्य सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.