शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाविरोधी चळवळी मंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 07:02 IST

लग्नात हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असला, तरी तो धाब्यावर बसवला जात आहे. पूर्वी हुंडाविरोधी चळवळींनी अशा प्रकारच्या घटना समाजासमोर आणल्या

पुणे : लग्नात हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असला, तरी तो धाब्यावर बसवला जात आहे. पूर्वी हुंडाविरोधी चळवळींनी अशा प्रकारच्या घटना समाजासमोर आणल्या आणि न्याय मिळवण्यासाठी झगडाही केला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये हुंडाविरोधी चळवळींचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी समुपदेशन केंद्रे उभारण्यात आली आहेत. हुंडाविरोधी चळवळीत मुलींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. वैयक्तिक जागरूकता हाच एकमेव उपाय असल्याचे मत महिला संघटना कार्यकर्त्या आणि जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. हुंडाबळीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, झोपडपट्टी अशा ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम राबवून कौटुंबिक हिंसाचार कायदा, स्त्रियांचे सामाजिक महत्त्व, कायद्याचे फायदे व तोटे, समुपदेशनाची गरज याविषयी माहिती देणे अपेक्षित आहे. पैसे, दागिने, कपडे, यांसारखी देवाणघेवाण बाजूला ठेवून मुलाची व मुलीची वैद्यकीय तपासणी करणे जास्त आवश्यक आहे, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.हुंडाविरोधी चळवळ सुरू केल्यानंतर कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. स्त्रियांबाबत वेगळ्या प्रकारचे कायदे अस्तित्वात आले. स्त्री आपल्या समस्या घेऊन कौटुंबिक न्यायालयात जाऊ शकते, तिथे तक्रार नोंदवू शकते. बऱ्याचदा पालक मुलींवर लग्नासाठी दबाव आणतात. दुसरीकडे काही समाजांत हुंडा नको; पण मुलीच्या अंगावर एवढे तोळे सोने घाला, लग्न थाटात लावून द्या, अशा छुप्या मार्गाने हुंडा घेतात. दुसरीकडे मात्र काही तरुण- तरुणींनी हुंडा न घेतादेखील लग्न केल्याची उदाहरणे आहेत; मात्र ती तुरळक आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे यांनी व्यक्त केले.हुंडा विरोधातील आमची चळवळ कधीही थांबली नाही. आज आपली पावले जागतिकीकरणाच्या दिशेने पडत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाकडे आपणा सर्वांचेच दुर्लक्ष झाले. प्रत्यक्ष जीवनात विवाहप्रसंगी मुलीकडची बाजू कनिष्ठ आणि मुलाकडची बाजू श्रेष्ठ, असेच मानले जाते. लग्नात दोन्हीकडचा खर्च; तसेच दागदागिने, भेटवस्तू, मालमत्ता, वरदक्षिणा या आणि अशा अनेक मागण्या वरपक्षाकडून अटीच्या स्वरूपात केल्या जातात.या सर्वांच्या विरोधात मुलींनी बोलले पाहिजे. तुझे मत, आवाज हे तुझे शस्त्र आहे. आणि त्या शस्त्राचा वापर करायला हवा. अत्याचाराविरोधात बोलले पाहिजे. माहेर हे मुलींचे हक्काचे घर आहे, त्यामुळे तिला तिच्या घरी येण्यास कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. पालकांनी मुलींचे विचार व्यापक केले पाहिजे, असे मत स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)