शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे

By admin | Updated: July 13, 2017 00:41 IST

२२ जुलैला फैसला : समितीसमोर मांडणार भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यावर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी सदाभाऊंनी केली असून, येत्या २२ जुलैला ते संघटनेच्या समितीपुढे भूमिका मांडणार आहेत. संघटनाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांना २३ प्रश्नांबाबत विचारणा केली आहे. त्यासाठी त्यांना २२ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी केली आहे. वास्तविक, यामुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे. सदाभाऊंनी उत्तरे सादर केल्यानंतरही तो कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे. भाजपशी सदाभाऊंच्या असलेल्या सलगीचा प्रश्न उपस्थित केला असला तरी, प्रत्यक्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच भाजपला रीतसर पाठिंबा दिला असल्याने, सदाभाऊंकडून याचा उल्लेख होऊ शकतो. स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या विरोधात सरकारने पत्र दिले असताना, सरकारच्या प्रत्येक गोष्टीत सदाभाऊंचा सहभाग दिसत असल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वास्तविक, सत्तेच्या काळात आजवर स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून भाजपला पाठिंबाच देत आली आहे. त्यामुळे एकट्या सदाभाऊ खोत यांना या वादात खेचण्यावरही उलट प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. सरकारची धोरणे पसंत नसतील तर संघटनेचे प्रमुख म्हणून राजू शेट्टींनीच त्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज होती. संघटनेने सदाभाऊंंना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराबाबतही विचारणा केली आहे. प्रत्यक्षात विधानसभेवेळी भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांचा प्रचार खुद्द राजू शेट्टी यांनीच केला होता. त्यामुळे हा मुद्दा संघटनेच्याच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखा आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिवसेनेशी जवळीक झाली आहे. त्याबद्दल सदाभाऊंकडूनही उलट प्रश्न उपस्थित होऊ शकतो. एकूणच वादाला वाद वाढत जाऊन, त्याचे फलित काहीच निघणार नाही, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरांनी वादाच्या विस्तवाला चालना दिली जाईल.मी लोकशाही मानणारा व जपणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. संघटनेच्या आदेशाप्रमाणे हजरही राहणार आहे. संघटनेनेच घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून मी चालत आहे. - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीदोन्ही बाजूंचे संभाव्य पर्याय...१ सदाभाऊंचे म्हणणे फेटाळून संघटना त्यांच्यावर कारवाई करू शकते. २ सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सदाभाऊंना राजीनामा देण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. ३ संघटनेतून हकालपट्टी करून सदाभाऊंचे मंत्रिपद काढून घेण्याची शिफारस सरकारकडे केली जाऊ शकते. ४ नवीन संघटना स्थापन करून सरकारमधील आपले स्थान टिकविण्याची खेळी सदाभाऊंकडून खेळली जाऊ शकते. ५ पक्षीय कारवाईनंतर भाजपकडून सदाभाऊंना प्रवेशाची ‘आॅफर’ दिली जाऊ शकते. ६ म्हणणे ऐकून सदाभाऊंना पुन्हा एक संधी देण्याची औपचारिकता संघटनेकडून पार पाडली जाऊ शकते. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १ मार्च रोजी मुंबईत मंत्रालयासमोर तूर आणि कांदाप्रश्नी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आपण आंदोलनस्थळी आलात. त्या आंदोलनात खासदार शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली असताना, आपण विचारपूस करण्याची तसदी का घेतली नाही?काँग्रेसच्या घराणेशाहीवर आपण वारंवार कठोर टीका केली. मात्र, आपल्या मुलाला निवडणुकीच्या राजकारणात आणण्याची घाई केली. ही घराणेशाही नाही का?खासदार शेट्टी आणि कार्यकर्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दबाव टाकतात, असे वक्तव्य आपण खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्याचा खुलासा करावा.मी लोकशाही मानणारा व जपणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. संघटनेच्या आदेशाप्रमाणे हजरही राहणार आहे. संघटनेनेच घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून मी चालत आहे. - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीखासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी न होता, भाजपच्या शिवार संवाद यात्रेत सहभागी का झालात?लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन् आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते न पाळता, आम्हाला हे शक्य नाही, असे सुप्रीम कोर्टात सरकारच्यावतीने लिहून दिले. ही भाजप सरकारने केलेली फसवणूक आहे, यावर आपले मत काय?