शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेला लेखणीनेच उत्तर द्या

By admin | Updated: May 2, 2016 00:40 IST

असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना

नाशिक : असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना उत्तर द्यावे. लेखकांनी डोळ््यांसमोर मोठी ध्येये ठेवावीत, असा सल्ला ज्येष्ठ अनुवादक व लेखिका उमा कुलकर्णी यांनी दिला.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित वाङ्मयीन पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उमा कुलकर्णी यांच्या हस्ते चंद्रकला कुलकर्णी व एल. के. कुलकर्णी यांना ‘गंगे तुझ्या तीराला’ या ललितेतर ग्रंथासाठी डॉ. वि. म. गोगटे पुरस्काराने, प्रणव सखदेव यांना उमेदीने कथालेखनासाठीच्या डॉ. अ. वा. वर्टी पुरस्काराने, सतीश काळसेकर यांना ‘पायपीट’साठी मु. ब. यंदे पुरस्काराने, डॉ. संजय ढोले यांना ‘संकरित’ या लघुकथासंग्रहासाठी पु. ना. पंडित पुरस्काराने, राकेश वानखेडे यांना ‘पुरोगामी’ कादंबरीसाठी धनंजय कुलकर्णी पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच हजार रुपये, स्मृतिचन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.सन्मानाला उत्तर देताना एल. के. कुलकर्णी यांनी सांगितले की, गंगेवर ग्रंथ लिहिताना ती कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने महान असल्याचे जाणवले; मात्र प्रदूषणामुळे मन विषण्ण झाले. देशातील नद्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. प्रणव सखदेव म्हणाले, कथेकडे पूर्वी कादंबरीचा सराव, विरंगुळ््याचे साधन या दृष्टीने पाहिले जात होते. आता मात्र अनेक तरुण लेखक या प्रकाराकडे वळत असल्याने दिलासा वाटतो. भारतीय पुराणकथांचा आधुनिक काळाशी संकर करायला हवा, असेही ते म्हणाले.सतीश काळसेकर यांनी आयुष्यात वाचन, संगीत व प्रचंड भटकंती केल्याचे सांगितले. त्यातील अंशत: भागच आपल्या पुस्तकात आला असून, या पुस्तकाचे श्रेय मित्राला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. संजय ढोले म्हणाले, लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी लेखन करीत आहे. सध्या विज्ञान नसलेल्या कथा लिहिल्या जात असल्याने वाचकांत संभ्रम निर्माण होत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. (प्रतिनिधी)‘पुरोगामी’ कादंबरीने आपल्याला लेखक म्हणून मान्यता मिळवून दिली. ६० वर्षांत पुरोगामित्व कोठून कोठे येऊन ठेपल्याची मीमांसा करणारी कादंबरी आहे.- राकेश वानखेडे