शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाणीटंचाईचा आणखी एक बळी

By admin | Updated: June 27, 2016 05:05 IST

मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला.

डोंबिवली : दिव्यात भीषण पाणीटंचाई असल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला. दिव्यातील पाणीटंचाईने दोन व्यक्तींचे असेच बळी गेले आहेत.ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिव्यात भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पर्याय नसल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी आणावे लागते. पाणी आणताना रूळ ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतो. रविवारी सकाळी अप धीम्या मार्गावर सीताराणी पटवा यांना अपघात झाला. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, कपडे धुण्यासाठी गेलेल्या सीताराणी पश्चिमेतून पूर्वेला जात होत्या. त्यादरम्यान अप धीम्या मार्गावरून आलेल्या लोकलचा त्यांना अंदाज आला नाही आणि गाडीची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती गंगाप्र्रसाद, विनोद, गोविंद, लक्ष्मीनारायण ही तीन मुले, रीना ही मुलगी, गुडिया (सून) असा परिवार आहे. दिव्यात पश्चिमेला रेल्वे रुळांनजीकच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या साईकुटीर इमारतीत पटवा कुटुंब २००९ पासून वास्तव्याला आहे.सहा महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दिव्यातून मुंब्रा स्थानकात पाणी भरण्याच्या निमित्ताने गेलेल्या एका नागरिकाचा लोकलची धडक लागून मृत्यू झाला होता. केवळ पाणीटंचाईमुळे पाण्याच्या शोधात अन्यत्र जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही ठाणे महापालिका प्रशासन नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करीत नाही. केवळ अश्वासने देते. येथील नगरसेवक निष्क्रिय असून दिवावासीयांची स्थिती अतिशय गंभीर होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाली. ठाणे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)