शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

अकरावी आॅनलाईन प्रवेशाची विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ?

By admin | Updated: July 14, 2016 20:28 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. आॅनलाईन प्रक्रियेत सामील न झालेल्या किंवा सामील झाल्यानंतर चुकीमुळे बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश विद्यार्थ्यांनी चूूकीचा अर्ज भरल्याने किंवा, पसंतीक्रम अर्जात चूकी केल्याने त्यांना आॅनलाईन प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले.याशिवाय अर्धवट माहितीमुळे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्रातील उरलेल्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली.अकरावीची तिसरी यादी मंगळवारी जाहीर झाली असून अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी १८ जुलैला अकरावीची चौथी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे २० जुलैपर्यंत चौथ्या यादीतील विद्यार्थी महाविद्यालयांत प्रवेश घेतील. त्यानंतरच अर्ज न भरलेले, चुकीचा अर्ज भरलेले, अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.