शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एक ताब्यात

By admin | Updated: April 27, 2015 02:00 IST

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे

खेड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी या तिघाही मृतांना ओळखले असून, सडलेल्या मृतदेहांचे नमुने तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत.लीलाबाई बापू सावंत (वय ४२), मनीषा बापू सावंत (१७), पूनम बापू सावंत (१२) यांचा खून करून त्यांचे मृतदेह रघुवीर घाटातील माकडकडी या जंगलमय भागात टाकून दिल्याप्रकरणी अशोक धोंडिराम ढवळे (रा. शिरगाव पिंपळवाडी, ता़ खेड) आणि अविनाश शिंदे (रा. शिंदी, ता. महाबळेश्वर, जि़ सातारा) या दोघांना पेण पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. खेड तालुक्यातील आणखी एका संशयिताला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी नातेवाइकांनी तिन्ही मृतदेह ओळखले असून, या प्रकरणी आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सडलेल्या मृतदेहांचे नमुनेदेखील तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत.मायलेकींचे सडलेले मृतदेह पेण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्या मृतदेहांचे विच्छेदन तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यावर ते मृतदेह खेड नगर परिषदेच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. या हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले आहेत. या तिघीही बेपत्ता झाल्याची तक्रार दीपाली प्रशांत शिंदे (२३, रा. दिवा) यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तपास करताना हे हत्याकांड उघड झाले. आरोपींनी तिघींना रघुवीर घाटात अज्ञातस्थळी ठेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृत लीलाबाई सावंत हिचा मोबाइल आरोपीकडे सापडल्यामुळेच आरोपीचा शोध लागल्याचा दावा पेण पोलिसांनी केला़ या तिहेरी हत्याकांडप्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबतचा तपास पेण पोलीस करीत असतानाच पोलिसांनी खेड तालुक्यातून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)