शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आणखी २ माजी सैनिकांचा शोध

By admin | Updated: May 18, 2017 00:09 IST

सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्याचा कर्मचारी धाकलू पाटील याच्यासह आणखी दोन माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तीन संचालकांचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्याचा कर्मचारी धाकलू पाटील याच्यासह आणखी दोन माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तीन संचालकांचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीर सिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, तपासादरम्यान नागालॅण्ड येथे कार्यरत आसाम रायफल रेजिमेंटचा जवान धाकलू पाटील याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. चौकशीसाठी धाकलू पाटीलला ताब्यात घेण्यास ‘आसाम रायफल’ने संमती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या गावीही पोलिसांचे पथक जाऊन आले. त्याची रीतसर रजा केवळ १५ एप्रिलपर्यंतच होती. तेव्हापासून तो घरी किंवा नोकरीवरही नसल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चे पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली. ‘आसाम रायफल’च्या नोकरीव्यतिरिक्त तो बेळगाव येथे सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणारी जय भवानी नावाची संस्थाही चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणाचा तपास जवळपास अंतिम टप्प्यात असून, काही आजी-माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या काही संचालकांसह २४ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तपासादरम्यान आणखी दोन माजी सैनिकांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला असून, पोलीस यंत्रणा त्यांचाही शोध घेत आहे. फरार घोषित करण्याची प्रक्रियाधाकलू पाटीलच्या अटकेसाठी सर्व प्रयत्न केले; परंतु तो घरी किंवा नोकरीच्या ठिकाणीही हजर नसल्याने त्याला फरार घोषित करण्याची विनंती न्यायालयास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धाकलू पाटील हा मुख्य आरोपींपैकी एक असल्याने त्याचा जबाब महत्त्वाचा आहे. त्याचे आणखी किती साथीदार आहेत, सैन्याची प्रश्नपत्रिका फोडण्याचे उद्योग यापूर्वी आणखी किती वेळा झालेत, या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडूनच मिळू शकतील, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.