शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

आणखी एक १५ डबा लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 01:40 IST

सीएसटी ते कल्याणदरम्यानचा गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी आणखी एक १५ डबा लोकल चालविण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जाणार आहे.

मुंबई : सीएसटी ते कल्याणदरम्यानचा गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी आणखी एक १५ डबा लोकल चालविण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जाणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर एक १५ डबा लोकल चालविण्याचा योग जुळून येईल. सध्या याच मार्गावर एक १५ डबा लोकल धावत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सुरुवातीला नऊ डबा लोकल धावत असतानाच गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी १२ डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नऊ डबा लोकलला आणखी तीन डबे जोडून १२ डबा लोकल दोन्ही मार्गांवर चालवण्यात आल्या. आता पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावर १२ डबा लोकलच धावत आहेत. मात्र या लोकलही अपुऱ्या पडत असल्याने १२ डबा लोकलला आणखी तीन डबे जोडून १५ डबा लोकल चालवण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला १५ डबाचा प्रयोग हा पश्चिम रेल्वेवर करण्यात आला. त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली. या मार्गावर सध्या दोन १५ डबा लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेनेही १५ डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. प्रथम सीएसटी ते कल्याणपर्यंत १५ डबा जलद लोकल चालवण्यासाठी या मार्गावरील जलद थांब्यावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली. सध्या याच मार्गावरच एकच लोकल धावत असून, तिच्या १६ फेऱ्या होतात. त्यामुळे प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळत आहे. पहिली १५ डबा लोकल २0१२मध्ये धावल्यानंतर आणखी एक १५ डबा लोकल चालवण्याचा योग जुळवून आणला जात आहे. मात्र ही लोकल नक्की कधी सुरू होईल याबाबत निश्चित अशी तारीख सूत्रांनी सांगितली नाही. (प्रतिनिधी)>जलद फेऱ्यांमध्ये समावेशसीएसटी ते कल्याणपर्यंत जलद मार्गावर ही लोकल सुरू केली जाईल. ही लोकल सुरू केल्यास सध्या धावत असलेल्या जलद लोकल फेऱ्यांमध्ये ती समाविष्ट करण्याचा प्रयत्न राहील.