ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - राज्यात गारपीटीने नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकारने अखेर मदत झाहीर केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या मदतीची घोषणा विधानसभेत केली असून यामध्ये नुकसान झालेल्या ग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या घोषणेनूसार फळबागासाठी हेक्टरी २५ हजार रूपये, गारपीटाने मृत पावलेल्या मोठया जनावरांसाठी २५ हजार रूपये, पक्क्या घरांचे नुकसान झालेल्यांसाठी ७० हजार रुपये, कोरडवहू शेतक-यांसाठी हेक्टरी १० हजार रुपये तर गारपीटीने मृत पावलेल्या शेळयांची भरपाई म्हणून ३,५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.