शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

‘फर्ग्युसन’च्या घोषणा देशविरोधी नव्हत्या

By admin | Updated: March 26, 2016 01:47 IST

अभाविप आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणा देशविरोधी अथवा देशविघातक नव्हत्या, असा निर्वाळा पोलिसांनी दिला असून

पुणे : अभाविप आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणा देशविरोधी अथवा देशविघातक नव्हत्या, असा निर्वाळा पोलिसांनी दिला असून, गृहविभागाला याबाबतचा पाठवला आहे. घोषणा देशविरोधक होत्या की नव्हत्या याविषयावरुन गदारोळ उठलेला असतानाच पोलिसांनी हा अहवाल दिल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.फर्ग्युसन महाविद्यालयात मंगळवारी अभाविपच्या जेएनयू शाखेचा अध्यक्ष आलोक सिंग याचे व्याख्यान आयोजित केले होते. हा कार्यक्रम विनापरवाना होता. त्यानंतर आंबेडकरी आणि डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांची हमरीतुमरी झाली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांना देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचे पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतल्यानंतर प्राचार्यांनी घुमजाव करीत प्रिंटींग मिस्टेक असल्याचे सांगून हे पत्रच मागे घेतले होते.दोन दिवस चाललेल्या या गोंधळामध्ये देशविरोधात घोषणाबाजी झाली किंवा नाही, याबाबतचा तसेच एकूणच प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी गृहविभागाला पाठवला आहे. ज्या घोषणा पोलिसांसमोर आल्या आहेत, त्यामध्ये एकही घोषणा देशविरोधात असल्याचे निदर्शनास आलेले नाही. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भावना दुखावतील अशा आणि देशविघातक घोषणा दिल्याचे आढळून आले नसल्याचे उपायुक्त तुषार दोषी यांनी सांगितले. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ, मैत्री सोशल फाऊंडेशन, दलित युवक आंदोलन, रिपब्लिकन संघर्ष दल, तथागत प्रेरणा ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. प्राचार्यांची भूमिका संशयास्पद असून, सांस्कृतिक पुण्यातील वातावरण गढूळ झाले असून बरेच प्रश्न अनुत्तरीत असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)