शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

चर्चा न करता कर्जमाफीची घोषणा करा

By admin | Updated: December 10, 2015 03:25 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा न करता, आधी कर्जमाफीची घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी बुधवारीही कायम ठेवली.

नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा न करता, आधी कर्जमाफीची घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी बुधवारीही कायम ठेवली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज गदारोळात तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारची कोंडी केली असून, मागणी पदरात पाडून घेतल्याखेरीज कामकाज होऊ द्यायचे नाही, अशी रणनीती आखली आहे. आज सकाळी कामकाज सुरू होताच, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, सर्व चर्चा बाजूला ठेवा आणि आधी कर्जमाफीची थेट घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांडली. तरीही अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्याने, विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन ते घोषण देऊ लागले. कर्जमाफीची मागणी शिवसेनेचीही आहे, अशी पुस्ती पवार यांनी जोडली. काँग्रेसने गेल्या वर्षी काढलेल्या मोर्चात पाच हजार लोक होते असा चिमटा काढून, ‘कालच्या मोर्चात मात्र लाखभर लोक होते, जनतेची मते बदलत आहेत,’ असेही ते म्हणाले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चर्चेची तयारी दर्शविली, पण त्याच वेळी विरोधकांना केवळ दुष्काळाचे राजकारण करायचे आहे, असेही वक्तव्य केल्याने विरोधकांच्या घोषणांना अधिकच जोर चढला. शेवटी अध्यक्षांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना व इतर कामकाज गदारोळातच आटोपले.दुष्काळप्रश्नी चर्चा किती करायची, आधीच्या दोन अधिवेशनातही आम्ही त्यावर बोललो. सरकारने काहीही दिलेले नाही. आता आम्हाला चर्चेत रस नाही; घोषणा करा, असे आवाहन अजित पवार यांनी महसूलमंत्री खडसे यांना केले. मात्र, त्यांच्याच शेजारी बसलेले माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी, गोंधळातच सुरूअसलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाचा आधार घेत, दुष्काळावर आपले मत व्यक्त केले. त्यावर खडसे यांनी सरकारने दुष्काळी भागात केलेल्या उपाययोजनांची माहिती विस्ताराने देण्याची संधी साधली!