शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

चर्चा न करता कर्जमाफीची घोषणा करा

By admin | Updated: December 10, 2015 03:25 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा न करता, आधी कर्जमाफीची घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी बुधवारीही कायम ठेवली.

नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा न करता, आधी कर्जमाफीची घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी बुधवारीही कायम ठेवली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज गदारोळात तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारची कोंडी केली असून, मागणी पदरात पाडून घेतल्याखेरीज कामकाज होऊ द्यायचे नाही, अशी रणनीती आखली आहे. आज सकाळी कामकाज सुरू होताच, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, सर्व चर्चा बाजूला ठेवा आणि आधी कर्जमाफीची थेट घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांडली. तरीही अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्याने, विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन ते घोषण देऊ लागले. कर्जमाफीची मागणी शिवसेनेचीही आहे, अशी पुस्ती पवार यांनी जोडली. काँग्रेसने गेल्या वर्षी काढलेल्या मोर्चात पाच हजार लोक होते असा चिमटा काढून, ‘कालच्या मोर्चात मात्र लाखभर लोक होते, जनतेची मते बदलत आहेत,’ असेही ते म्हणाले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चर्चेची तयारी दर्शविली, पण त्याच वेळी विरोधकांना केवळ दुष्काळाचे राजकारण करायचे आहे, असेही वक्तव्य केल्याने विरोधकांच्या घोषणांना अधिकच जोर चढला. शेवटी अध्यक्षांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना व इतर कामकाज गदारोळातच आटोपले.दुष्काळप्रश्नी चर्चा किती करायची, आधीच्या दोन अधिवेशनातही आम्ही त्यावर बोललो. सरकारने काहीही दिलेले नाही. आता आम्हाला चर्चेत रस नाही; घोषणा करा, असे आवाहन अजित पवार यांनी महसूलमंत्री खडसे यांना केले. मात्र, त्यांच्याच शेजारी बसलेले माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी, गोंधळातच सुरूअसलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाचा आधार घेत, दुष्काळावर आपले मत व्यक्त केले. त्यावर खडसे यांनी सरकारने दुष्काळी भागात केलेल्या उपाययोजनांची माहिती विस्ताराने देण्याची संधी साधली!