शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

भारती विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By admin | Updated: May 10, 2014 20:33 IST

माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला.

पुणे : ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष, कुलपतींनी जागविलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या आठवणी, माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, ॲड. रावसाहेब शिंदे, डॉ. उत्तमराव भोईटे, डॉ. एस. एफ. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले विद्याथी यांंच्या सन्मानाबरोबरच संस्थेमध्ये विशेष कार्य केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना सेवागौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, विविध क्षेत्रातील स्पर्धा आणि गुणवत्तेचे महत्व लक्षात घेवून भारती विद्यापीठाने पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. स्वप्न पाहणे आणि ते स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव घेणे हे भाग्य खुप कमी लोकांच्या वाट्याला येते ते माझ्या वाट्याला आले आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षक पेशात काम करण्यासाठी उत्सुक असणार्‍यांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रा. के. डी. जाधव यांनी आभार मानले. डॉ. विवेक रणखांबे, डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सुत्रलसंचालन केले.