शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

भारती विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By admin | Updated: May 10, 2014 20:33 IST

माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला.

पुणे : ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष, कुलपतींनी जागविलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या आठवणी, माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, ॲड. रावसाहेब शिंदे, डॉ. उत्तमराव भोईटे, डॉ. एस. एफ. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले विद्याथी यांंच्या सन्मानाबरोबरच संस्थेमध्ये विशेष कार्य केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना सेवागौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, विविध क्षेत्रातील स्पर्धा आणि गुणवत्तेचे महत्व लक्षात घेवून भारती विद्यापीठाने पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. स्वप्न पाहणे आणि ते स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव घेणे हे भाग्य खुप कमी लोकांच्या वाट्याला येते ते माझ्या वाट्याला आले आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षक पेशात काम करण्यासाठी उत्सुक असणार्‍यांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रा. के. डी. जाधव यांनी आभार मानले. डॉ. विवेक रणखांबे, डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सुत्रलसंचालन केले.