शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

अणेंचा राजीनामा

By admin | Updated: March 23, 2016 04:31 IST

विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वक्तव्य करून राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी बनलेले श्रीहरी अणे यांनी अखेर महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द केला

मुंबई : विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वक्तव्य करून राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी बनलेले श्रीहरी अणे यांनी अखेर महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द केला. राज्यपालांनी तो मंजूर केला. अणेंच्या राजीनाम्यामुळे राज्यात उठलेले राजकीय वादंग थंडावले आहे.अपेक्षेनुसार अणे यांनी सोमवारी सकाळी १०.३० सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. सकाळी ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांसह शिवसेनेच्या सदस्यांनी अणे यांच्यावर कारवाईची मागणी करीत घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला का, अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाधिवक्त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यावा, अशी कायदेविषयक तरतूद आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपाल घेतात. राज्यपालांकडे राजीनामा सोपविल्यानंंतर तो ते स्वीकारतात किंवा मंत्रिमंंडळाचे मत मागवितात. राज्यपालांनी मंत्रिमंडळाला अशी विचारणा केली तर राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी शिफारस मंत्रिमंडळ करेल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशानंतर अणेंवरून उठलेले राजकीय वादळ शांत झाले. चौभाजन करा - मा.गो. वैद्यमहाराष्ट्राची एक-दोन नव्हे, तर चार तुकडे पाडा आणि चार नव्या राज्यांची निर्मिती करा, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. ते म्हणाले, संघाच्या परिभाषेत महाराष्ट्राचे चार प्रांत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि देवगिरी अर्थात मराठवाडा-खान्देश अशी संघाने महाराष्ट्राची विभागणी पूर्वीच केली आहे. हे चार प्रांतच स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात यावेत, अशी वैद्य यांची मागणी आहे. > मी सरकारचा नव्हे लोकांचा वकील होतोवेगळ्या विदर्भाची वारंवार मागणी करत वेगळ्या मराठवाड्याचीही कल्पना मांडून टीकेचे धनी झालेल्या राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना मी राज्य सरकारची बाजू मांडणारा नसून, लोकांची बाजू मांडणारा होतो, असे स्पष्ट करत विधिमंडळाचे कामकाज ठप्प करणाऱ्या आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. आमदारांनी कामकाज ठप्प पाडण्यापेक्षा समस्या सोडविण्याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांमध्ये आमदारांवर त्यांनी टीका केली आहे.महाधिवक्ता आता कोण?श्रीहरी अणे यांनी राजीनाम्यानंतर आता महाधिवक्ता पदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे, अ‍ॅड. अनिल साखरे, अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी आणि अ‍ॅड. मिलिंद साठे यांच्या नावांची चर्चा असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. अ‍ॅड. आपटे हे रा.स्व. संघाच्या जवळचे मानले जातात. त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब आपटे हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी आणि अनिल साखरे यांनी सरकारच्या मोठ्या केसेस लढल्या आहेत. शिवाय, अल्प काळासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही कामकाज पाहिले आहे. हे तर संघाचे डावपेच - राज ठाकरेराज्य तोडण्याचे काम अणेंपेक्षा रा.स्व. संघ आणि भाजपाच अधिक करीत आहेत. हे मनसुबे त्यांच्याच मनातील आहेत. अणे यांचा बोलविता धनी संघ-भाजपाच आहे. छोट्या राज्यांची कल्पना संघाची आहे. भाजपा तीच पुढे नेत आहे. त्यातही अणे नागपूरचे असून त्यांच्या मनात नसतानाही त्यांना महाधिवक्ता पदावर बसविण्यात आले होते. संघाला अपेक्षित काम त्यांनी केले आणि आता राजीनामा देऊन मोकळे झाले. - राज ठाकरे, मनसेप्रमुख> अखेर सरकारची डोकेदुखी टळली...जालना येथे रविवारी मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या एका कार्यक्रमात बोलताना महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासोबतच मराठवाड्याचेही वेगळे राज्य करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. अणे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले होते. विरोधकांसह शिवसेनेने अणे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरकारची कोंडी झाली होती. शिवसेनेने तर अणे यांचा राजीनामा होईपर्यंत मंत्री बैठकांना जाणार नाहीत, असा इशारा दिला होता. अणे यांना महाधिवक्ता या पदावरून दूर करावे, असे ठराव राष्ट्रवादी व शिवसेनेकडून मांडण्यात आले होते. अणे यांच्या राजीनाम्याबाबत काही निर्णय न झाल्यास या ठरावावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांसोबत शिवसेनेकडूनही केली जाणार होती. तसे झाले असते तर सरकारची अडचण आणखीनच वाढली असती. मात्र, अणे यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याने सरकारची डोकेदुखी टळली.