शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

By admin | Updated: July 2, 2016 03:39 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हजारे यांची पुन्हा गुरु वारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी अध्यक्ष गंगाराम शेलार, सरचिटणीस पाटील, उपाध्यक्ष अर्जुन बुवा चौधरी आदी उपस्थित होते. समितीने यापूर्वी २० जूनला हजारे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी असल्याचे भासवून महेश निंबाळकर यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यावरच २७ गावांतील बेकायदा बांधकामे करून अनियमितता केल्याचा आरोप करणारे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यासंदर्भात हजारे यांना स्पष्टीकरण देण्यासाठी ही मंडळी गेली होती. मात्र, आपण सर्व समित्या कधीच बरखास्त केल्या आहेत. बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्र ार नोंदवण्याचा सल्ला या वेळी हजारे यांनी संघर्ष समितीला दिला. त्यानुसार, समिती निर्णय घेणार आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.२७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती २० वर्षांपासून प्रामाणिकपणे नागरी हक्कांसाठी लढा देत आहे. तो यापुढेही सुरूच राहील. समितीच्या विरोधकांना ते अडचणीचे ठरत आहे. म्हणून, कुणाला तरी पुढे करून समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी आम्ही आमची खरी बाजू मांडण्यासाठी हजारे यांची भेट घेतली.- अर्जुन बुवा चौधरी, उपाध्यक्ष, २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समिती