शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अण्णा हजारे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे हस्तक - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी

By admin | Updated: June 2, 2017 17:44 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 2 -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी  संपाला पाठिंबा दर्शवला आहे.  मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.  
 
 शेतकरी संपाला अण्णा हजारे यांच्या पाठिंब्याची गरज नाही. ते आंदोलनादरम्यान आणि आंदोलनानंतर जराही फिरकले नाहीत. आता आंदोलन एका मोठ्या वळणावर आले असता ते मध्यस्थी करत आहेत. पण त्यांनी किसान क्रांतीच्या सदस्यांना मध्यस्थी करताना विचारले आहे का?, असाही प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. 
 
खरं तर राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना ते एका आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत.  खरं तर अण्णा हजारे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला आहे.  
 
""अण्णांनी आमची वकिली करू नये. आम्ही शेतकरी आमची वकिली करण्यास समर्थ आहोत,  असेही जयाजीराव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.  
 
 
""शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खासगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
 
जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे.
 
अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे"", असे सांगत अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शनला आहे.  मात्र अण्णांचा पाठिंबा नको असल्याचे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.