शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अण्णा हजारे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे हस्तक - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी

By admin | Updated: June 2, 2017 17:44 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 2 -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी  संपाला पाठिंबा दर्शवला आहे.  मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.  
 
 शेतकरी संपाला अण्णा हजारे यांच्या पाठिंब्याची गरज नाही. ते आंदोलनादरम्यान आणि आंदोलनानंतर जराही फिरकले नाहीत. आता आंदोलन एका मोठ्या वळणावर आले असता ते मध्यस्थी करत आहेत. पण त्यांनी किसान क्रांतीच्या सदस्यांना मध्यस्थी करताना विचारले आहे का?, असाही प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. 
 
खरं तर राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना ते एका आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत.  खरं तर अण्णा हजारे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला आहे.  
 
""अण्णांनी आमची वकिली करू नये. आम्ही शेतकरी आमची वकिली करण्यास समर्थ आहोत,  असेही जयाजीराव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.  
 
 
""शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खासगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
 
जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे.
 
अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे"", असे सांगत अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शनला आहे.  मात्र अण्णांचा पाठिंबा नको असल्याचे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.