शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

प्रस्ताव फेटाळल्याने अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, कुपोषणाहून बुलेट ट्रेन महत्त्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:27 IST

गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने सोमवारी फेटाळला आहे. तरी यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महिला व बाल विकास सचिव आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक मंगळवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात पार पडणार आहे.

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने सोमवारी फेटाळला आहे. तरी यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महिला व बाल विकास सचिव आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक मंगळवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचा-यांचा संप आणखी काही दिवस सुरूच ठेवण्याच्या निर्णयावर कृती समिती ठाम आहे.कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले की, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी महिला व बाल विकास विभागाने पाठवलेला प्रस्ताव वित्त विभागाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती दिली. शिवाय मंगळवारी तातडीने दुसरा प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन करत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद ठेवून पोषण आहार वाटपाचे काम आणखी काही दिवस बंद राहणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांना १० हजार ५०० आणि मदतनीसांना ८ हजार रुपये मासिक मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावानुसार अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनासाठी शासनाला वर्षाला १ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार होती. एवढा बोजा सरकारला झेपणार नसल्याचे सांगत वित्त विभागाने हा प्रस्ताव फेटाळल्याचे समजते.उद्या आझाद मैदानात मोर्चाअंगणवाडी कर्मचाºयांच्या कृती समितीमधून बाहेर असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने बुधवारी, २० सप्टेंबर रोजी आझाद मैदानात धडक मोर्चाची हाक दिली आहे.>‘कुपोषणमुक्ती’सारखे महत्त्वाचे काम करणाºया अंगणवाडी कर्मचाºयांनीसंप करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, केवळ ७ हजार लोकांच्या प्रवासाची व्यवस्था करणाºया बुलेट ट्रेनसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. याउलट कुपोषणाविरोधात काम करणाºया २ लाख ७ हजार कर्मचाºयांची मानधनवाढ आणि पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यास शासनाकडे १ हजार कोटी रुपये नाहीत. त्यामुळे शासनाला बुलेट ट्रेन ही कुपोषणमुक्तीहून अधिक महत्त्वाची वाटते का,असा सवाल कृती समितीच्या नेत्या शुभा शमीम यांनी उपस्थित केला आहे.संपात फूट पाडण्यासाठी खोटी पत्रे : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचा आरोप कृती समितीच्या नेत्या कमल परूळेकर यांनी केला आहे. संपात फूट पाडण्यासाठी संप मागे घेतल्याबाबत जिल्हा परिषदेकडून आभार मानणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.