शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

मराठवाड्यात जनावरांचा बाजार उठला

By admin | Updated: July 17, 2015 00:11 IST

तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने

औरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दावण रिकामी होत असतानाच किमती निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांना आपले पशूधन बेभाव विकावे लागत आहे.मनुष्याला पिण्याला पाणी आणि खायला अन्न मिळणे कठीण झाले असताना जनावरांना कोण सांभाळेल? म्हणूनच औरंगाबादेतील छावणीत गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात जनावरांची मोठी गर्दी दिसली. मात्र, खरेदीदार भेटेना, जे आहेत ते कमी भावाने मागू लागले.बैल विकावे का विकू नये, या संभ्रमात असलेले जनार्दन नावकर मोठ्या खरेदीदारांची प्रतीक्षा करीत बसले होते. जालना जिल्ह्यातील घाटी शिरसगाव येथील नावकर यांनी बैलजोडी विक्रीला आणली होती. मागील वर्षी ४५ हजार रुपयांमध्ये खरेदी केलेली ही जोडी आता त्यांना सांभाळणे कठीण जात आहे. नावकर म्हणाले की, सकाळी ८ पासून बाजारात आलो. आता सायंकाळ झाली. पण एवढ्या वेळात २ ग्राहक आले; पण त्यांनी ३० हजारांत बैल मागितल्याने सौदा झाला नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजारमध्येही असेच चित्र आहे. या बाजारात हजारो जनावरे विक्रीस येत आहेत. यात बैलांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे पेरणीच्या वेळी ज्या बैलजोडीची किंमत ८० ते ९० हजार होती, त्याच बैलजोडीची किंमत आता ४० ते ५० हजारांवर आली आहे. उस्मानाबाद येथील सुनील मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली ५१ हजार रुपयांची बैलजोडी चाऱ्याअभावी विक्रीस काढली. मात्र व्यापाऱ्यांनी केवळ २० हजारांत मागितल्याचे त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील पारडगाव येथील जनावरांच्या बाजारावर दुष्काळाची गडद छाया आहे. गतवर्षी येथे १ कोटींची उलाढाल झाली होती. यंदा हे प्रमाण ३ लाखांवर असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. (लोकमत चमू)- लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळीच्या बाजारात विक्रीसाठीच्या पशुधनाची संख्या वाढली आहे, तर पशुधन कसे जगवायचे या भीतीने खरेदीदारांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे़ - ७० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या येथील जनावरांच्या बाजारास आजही महत्त्व आहे़ येथील बाजारात देवणी, लाल कंधारी, संकरित, गावरान आदी जातींची जनावरे मिळतात़ गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे़- दरवर्षी येथे आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत पशुधनाचा मोठा बाजार भरतो़ पण यंदा जून-जुलैमध्येही तितकाच बाजार भरत आहे़ पशुधनाच्या विक्रीची संख्या वाढली असली तरी आठवड्याला ३०च्या जवळपास जनावरांची खरेदी- विक्री होत असल्याचे ग्रामपंचायतीचे लिपिक संभाजी निटुरे यांनी सांगितले़