शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

मराठवाड्यात जनावरांचा बाजार उठला

By admin | Updated: July 17, 2015 00:11 IST

तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने

औरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दावण रिकामी होत असतानाच किमती निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांना आपले पशूधन बेभाव विकावे लागत आहे.मनुष्याला पिण्याला पाणी आणि खायला अन्न मिळणे कठीण झाले असताना जनावरांना कोण सांभाळेल? म्हणूनच औरंगाबादेतील छावणीत गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात जनावरांची मोठी गर्दी दिसली. मात्र, खरेदीदार भेटेना, जे आहेत ते कमी भावाने मागू लागले.बैल विकावे का विकू नये, या संभ्रमात असलेले जनार्दन नावकर मोठ्या खरेदीदारांची प्रतीक्षा करीत बसले होते. जालना जिल्ह्यातील घाटी शिरसगाव येथील नावकर यांनी बैलजोडी विक्रीला आणली होती. मागील वर्षी ४५ हजार रुपयांमध्ये खरेदी केलेली ही जोडी आता त्यांना सांभाळणे कठीण जात आहे. नावकर म्हणाले की, सकाळी ८ पासून बाजारात आलो. आता सायंकाळ झाली. पण एवढ्या वेळात २ ग्राहक आले; पण त्यांनी ३० हजारांत बैल मागितल्याने सौदा झाला नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजारमध्येही असेच चित्र आहे. या बाजारात हजारो जनावरे विक्रीस येत आहेत. यात बैलांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे पेरणीच्या वेळी ज्या बैलजोडीची किंमत ८० ते ९० हजार होती, त्याच बैलजोडीची किंमत आता ४० ते ५० हजारांवर आली आहे. उस्मानाबाद येथील सुनील मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली ५१ हजार रुपयांची बैलजोडी चाऱ्याअभावी विक्रीस काढली. मात्र व्यापाऱ्यांनी केवळ २० हजारांत मागितल्याचे त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील पारडगाव येथील जनावरांच्या बाजारावर दुष्काळाची गडद छाया आहे. गतवर्षी येथे १ कोटींची उलाढाल झाली होती. यंदा हे प्रमाण ३ लाखांवर असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. (लोकमत चमू)- लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळीच्या बाजारात विक्रीसाठीच्या पशुधनाची संख्या वाढली आहे, तर पशुधन कसे जगवायचे या भीतीने खरेदीदारांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे़ - ७० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या येथील जनावरांच्या बाजारास आजही महत्त्व आहे़ येथील बाजारात देवणी, लाल कंधारी, संकरित, गावरान आदी जातींची जनावरे मिळतात़ गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे़- दरवर्षी येथे आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत पशुधनाचा मोठा बाजार भरतो़ पण यंदा जून-जुलैमध्येही तितकाच बाजार भरत आहे़ पशुधनाच्या विक्रीची संख्या वाढली असली तरी आठवड्याला ३०च्या जवळपास जनावरांची खरेदी- विक्री होत असल्याचे ग्रामपंचायतीचे लिपिक संभाजी निटुरे यांनी सांगितले़