शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

‘नाराजी’नामा!

By admin | Updated: July 22, 2014 02:17 IST

अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

नारायण राणो यांचा मुख्यमंत्र्यांवर ठपका : 
प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात
मुंबई : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे असले तरी जनहिताची कामे जलद गतीने होत नाहीत, अशा एक ना अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहूनच आपण पुढील भूमिका जाहीर करू, असे सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीची दिशा संदिग्ध ठेवली. 
दरम्यान, राणोंचा राजीनामा स्वीकारला नसून ते पक्षातच राहतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टि¦टरवर  स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणो यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती मी त्यांना केली. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बसून चर्चा करू,  असे ठाकरे म्हणाले. राजीनामापत्रत राणो यांनी मुख्यमंत्र्यांची कार्यशैली आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढविली गेली,
तर पक्षाला विजय मिळणो कठीण 
आहे. भविष्यातील पक्षाच्या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे राणो यांनी ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
 
शब्द पाळला नाही
नऊ वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये आलो तेव्हाच आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण ते पाळले नाही. आपल्या समर्थकांना मंत्रिपद, विधान परिषद सदस्य वा महामंडळांवरही नियुक्त केले गेले नाही, असे आरोप राणो यांनी केले. 2क्क्9मध्ये माणिकराव ठाकरेंऐवजी देऊ केलेले प्रदेशाध्यक्षपद आणि त्याच वर्षी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद आपण नाकारले होते, असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांवर आक्षेप
च्लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठलेही प्रय} केलेले नाहीत.
च्जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही.
च्भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय होताना दिसत नाहीत.
च्प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात.
च्सरकार आणि सत्तारूढ पक्षात समन्वय नाही.
 
असा आहे ‘नाराजी’नामा 
च्बाराबलुतेदारांच्या संस्थांना कजर्माफीचा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला, पण अंमलबजावणी नाही.
च्बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना छोटी कामे देण्याचा निर्णय नाही.
च्एमआयडीसीच्या जागेवरील झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन वर्षापासून प्रलंबित.
च्सागरी महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी बीकेसीमध्ये अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याचा निर्णय होत नाही.
 
राणो काँग्रेसमध्येच राहतील
राणोंनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आश्वासन आपल्याला आजच्या भेटीत दिल्याचे टि¦ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वर्षा बंगल्यावर राणोंशी झालेल्या भेटीनंतर केले. त्यांनी राजीनामा दिला तो आपण स्वीकारलेला नाही, असे ते म्हणाले.