शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सरकारी दर्जासाठी अंगणवाडीतार्इंचा हल्लाबोल!

By admin | Updated: March 11, 2017 01:28 IST

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. या वेळी भाऊ म्हणून अंगणवाडीतार्इंशी संवाद साधण्यास आलेल्या भाजपा आमदार राम कदम यांचीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतली.अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना पोषण, आरोग्य शिक्षण, स्वच्छता या संबंधीच्या सेवा देण्याचे महत्त्वाचे काम अत्यल्प मानधनावर करत आहेत. मात्र सरकारी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनी कर्मचारी म्हणून नेमले जात आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकारांपासूनही वंचित राहावे लागत आहे. त्याचाच रोष व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध ६ संघटनांनी एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला.दरम्यान, धोबी समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्यास आलेल्या आमदार राम कदम यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला भेट दिली. व्यासपीठावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी मानलेला भाऊ म्हणून कदम यांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. ‘महिला व बाल विकास खात्यासाठी पंकजा मुंडे यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्या मिळाल्या,’ असा उल्लेख कदम यांनी केला. त्यांच्या पहिल्याच वाक्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकारघंटा वाजवत मुंडे यांचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे कदम यांची पंचाईत झाली. मुंडेंबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतलेला पवित्रा पाहून कदम यांनी थेट ‘मुख्यमंत्र्यांवर तरी तुमचा विश्वास आहे ना?’ असे बोलत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. मानधनवाढीबाबत आपण खुद्द मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना शांत केले. (प्रतिनिधी)भाजपाच्या जाहीरनाम्याची पोलखोललोकसभा निवडणुकीत भाजपाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे जाहीरनाम्यात नमूद केले होते, असे म्हणत कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी कदम यांच्यासमोरच जाहीरनाम्याची पोलखोल केली. आघाडी सरकारची सत्ता असताना २०१० साली लोकसभा आणि राज्यसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करणारा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र भाजपा सरकार अद्याप त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे उटाणे यांनी कदम यांच्या निदर्शनास आणून दिले.सरकारी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनी कर्मचारी म्हणून नेमले जात आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकारांपासूनही वंचित राहावे लागत आहे.त्याचाच रोष व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध ६ संघटनांनी एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला.