शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सरकारी दर्जासाठी अंगणवाडीतार्इंचा हल्लाबोल!

By admin | Updated: March 11, 2017 01:28 IST

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. या वेळी भाऊ म्हणून अंगणवाडीतार्इंशी संवाद साधण्यास आलेल्या भाजपा आमदार राम कदम यांचीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतली.अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना पोषण, आरोग्य शिक्षण, स्वच्छता या संबंधीच्या सेवा देण्याचे महत्त्वाचे काम अत्यल्प मानधनावर करत आहेत. मात्र सरकारी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनी कर्मचारी म्हणून नेमले जात आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकारांपासूनही वंचित राहावे लागत आहे. त्याचाच रोष व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध ६ संघटनांनी एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला.दरम्यान, धोबी समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्यास आलेल्या आमदार राम कदम यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला भेट दिली. व्यासपीठावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी मानलेला भाऊ म्हणून कदम यांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. ‘महिला व बाल विकास खात्यासाठी पंकजा मुंडे यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्या मिळाल्या,’ असा उल्लेख कदम यांनी केला. त्यांच्या पहिल्याच वाक्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकारघंटा वाजवत मुंडे यांचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे कदम यांची पंचाईत झाली. मुंडेंबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतलेला पवित्रा पाहून कदम यांनी थेट ‘मुख्यमंत्र्यांवर तरी तुमचा विश्वास आहे ना?’ असे बोलत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. मानधनवाढीबाबत आपण खुद्द मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना शांत केले. (प्रतिनिधी)भाजपाच्या जाहीरनाम्याची पोलखोललोकसभा निवडणुकीत भाजपाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे जाहीरनाम्यात नमूद केले होते, असे म्हणत कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी कदम यांच्यासमोरच जाहीरनाम्याची पोलखोल केली. आघाडी सरकारची सत्ता असताना २०१० साली लोकसभा आणि राज्यसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करणारा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र भाजपा सरकार अद्याप त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे उटाणे यांनी कदम यांच्या निदर्शनास आणून दिले.सरकारी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनी कर्मचारी म्हणून नेमले जात आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकारांपासूनही वंचित राहावे लागत आहे.त्याचाच रोष व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध ६ संघटनांनी एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला.