विक्रमगड : ६ वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी खेड्यापाड्यात अंगणवाड्यांची निर्मिती केली. परंतु अंगणवाड्यांची फारच दयनीय अवस्था आहे. तालुक्यात २४७ अंगणवाड्या असून येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, खेळणी साहित्य इत्यादींचा अभाव आहे. फक्त आहार मिळतो म्हणून अंगणवाडी सुरू अशी परिस्थिती आहे.७० ते ८० अंगणवाडया दुरूस्तीच्या प्रस्ताव धुळखात आहे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गरज असून या विद्यार्थ्यांनी पाण्यासाठी एखाद्या खासगी विहिर किंवा बोअरवेलचा अधार घ्यावा लागतो. या अंगणवाडयाच्या विद्यार्थ्यांना पूर्ण सोयीयुक्त अशा प्रकाराची मागणी पालकांनी केली आहे. तालुक्यात अंगणवाडयामध्ये विज कनेक्शन असणे आवश्यक आहे परंतु एकाही अंगणवाडीमध्ये वीज नाही नवीन अंगणवाडया आजही अपूर्ण अशी अवस्था तालुक्यातील जवळपास सर्वच अंगणवाड्यांमध्ये आहे. (वार्ताहर) एकीकडे शाळा डिझिटलायझन होन असतना मात्र अंगणवाडीचे चित्र बदलण्याची गरज आहे. शासन प्रत्येक अंगणवाडयामध्ये सी.सी. टीव्ही कॅमेरे लावण्याचे ठरत असताना मात्र अंगणवाडयामध्ये लाईट व्यवस्था नाही.अंगणवाडीची दुरूस्ती होत नाही. नवीन इमारती नाही. आजही ३० ते ३५ अंगणवाडयामध्ये खाजगी घरात भरविल्या जातात.
अंगणवाड्यांत पाणी, विजेची सोय हवी
By admin | Updated: June 9, 2016 03:47 IST