शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

... तर शाळांची संलग्नता काढून घेऊ

By admin | Updated: March 30, 2015 02:36 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या(बोर्ड) दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार झालेल्या शाळांमधील संबंधित शिक्षकांवर शाळा प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या(बोर्ड) दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार झालेल्या शाळांमधील संबंधित शिक्षकांवर शाळा प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. अशा कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या शाळांची संलग्नता आता राज्य मंडळाकडून काढून घेतली जाणार आहे.राज्यात परीक्षांदरम्यान गैरप्रकार घडलेल्या शाळांना नोटीस बजावण्याचे आदेश विभागीय मंडळांना दिले जाणार आहेत. परीक्षेदरम्यान चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शाळांनी सहा महिन्यांत कारवाई करणे आवश्यक आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर शाळा प्रशासनाने विभागीय चौकशी करायला हवी. त्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई झाली नाही, तर शिक्षण मंडळातर्फे संबंधित शाळेची संलग्नता काढून घेतली जाईल. मग त्या शाळेला राज्य मंडळाचे परीक्षा अर्ज भरता येणार नाहीत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. परंतु, शाळा प्रशासनाकडूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही म्हमाणे यांनी स्पष्ट केले.