शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

...अन् क्षणार्धात निर्णय बदलला

By admin | Updated: May 19, 2014 03:17 IST

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने मावळते रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि त्याबाबतच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दोन दिवसांत दिल्या.

मुंबई : उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने मावळते रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि त्याबाबतच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दोन दिवसांत दिल्या. त्यानुसार लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपताच एक्सप्रेस गाड्यांच्या आणि उपनगरीय लोकलच्या भाड्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच याची अंमलबजावणी २० मेपासून लागू केली जाणार होती. मात्र मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणार्धात निर्णयात बदल करून भाडेवाढीच्या निर्णयाची जबाबदारी नवीन सरकारवर टाकत आपल्याकडून घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. देशभरात रेल्वे प्रवाशांची संख्या ०.५३ टक्क्यांनी घटली असून, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. मोठी भाडेवाढ गेल्या काही वर्षांत न केल्याने रेल्वेचे उत्पन्न वाढत नव्हते. हे पाहता १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आणि त्यावर रेल्वेमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. या भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच उपनगरीय लोकल प्रवाशांना फटका अधिक बसणार आहे. रेल्वेच्या मासिक आणि त्रैमासिक पासांच्या दरात मोठी वाढ होणार असल्याने मुंबईकरांच्या खिशाला तर कात्री लागणार आहे. ही भाडेवाढ होताना यावर ४.२ टक्के अधिभारही लागणार असल्याने पासाच्या दरात होणारी वाढ प्रवाशांना परवडणारी नाही. याची अधिसूचना रेल्वेकडून काढतानाच प्रसिद्धीपत्रकही लोकसभा मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत काढले होते. (प्रतिनिधी)