शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

...आणि म्हणे हिंदू धर्म परमसहिष्णू आहे!

By admin | Updated: September 11, 2015 03:37 IST

श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे

-  हेमंत कुलकर्र्णी श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे भरणाऱ्या त्यांच्या जिव्हांनी त्यांना दिव्याच्या अमावस्येलाच गटारीची आवस बनवून टाकण्यासाठी उद्युक्त केलेले.मुळात केवळ श्रावणातच नव्हे, तर चतुर्मासात वातुळ म्हणजे पचायला जड पदार्थांचे सेवन बव्हंशी धर्मांनी (अगदी हिंदू धर्मासकट) त्याज्य ठरविले कारण तेव्हा पावसाळा असतो आणि या काळात पोटातील अग्नी मंद होत असतो. म्हणजे सामीष पदार्थांच्या सेवनाचा संबंध थेट आरोग्य रक्षणाशी आहे. पूर्वी ते सांगून पटले नसते म्हणून त्याला धर्माची जोड, इतकेच. तरीही जे महिनाभर दम धरू शकतात, त्यांचा जीव चार-आठ दिवस दम धरायला इतका कासावीस व्हावा?तरीही श्रावण वगळता एरवी रोजच मांसाहार करणारे, तो खिशाला आणि पोटालाही परवडू शकणारे असे कितीसे लोक आहेत? मटण फार महाग झाले हो, परवडत नाही,अशी तक्रार कोणाची असते? आठवड्यातले रविवार आणिबुधवार वगळता, अन्य दिवशी मांसाहार वर्ज्य मानणारे बहुसंख्य आहेत. उरलेले पाच दिवस मग ते कशी तग धरू शकतात? संपूर्ण श्रावण महिना आणि आठवड्यातले पाच दिवस नित्याचे मांसाहारी मांसभक्षण करीत नाहीत तेव्हा केवळ त्याच व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, त्यांच्या पोटाची काळजी कोण वाहत असते? तरीही रोज मांसमच्छी खाल्ल्याशिवाय ज्यांचे पानच हलू शकत नाही असेच बहुसंख्य लोक महाराष्ट्रात आहेत, असे गृहीत धरले आणि त्यांनी त्यांच्या होणाऱ्या संभाव्य उपासमारीसाठी आकाश-पाताळ एक करण्याचा उपक्रम सुरू केला तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलाच आहे. पण लोकशाहीने कोणालाही परधर्माविषयी आणि परधर्माच्या आस्थांविषयी अत्यंत हिणकस उद्गार काढण्याचा अधिकार दिलेला नाही. का मग येथेही बहुसंख्य आणि अल्पसंख्य असा भेद केला जातो आणि जे अल्पसंख्य आहेत पण आक्रमक नाहीत कारण त्यांच्या धर्मातच अहिंसा आहे त्यांची अवहेलना करण्याची मोकळीक आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रातील तमाम मांसभक्षकांचे केवळ आपणच तारणहार आहोत असे मानणाऱ्यांच्या दुभंगातून एरवी किरकोळ वाटणारा वाद गलिच्छपणाच्या मर्यादा पार करून गेला आहे. जैन धर्मातील दिगंबरांची अवहेलना करतानाच त्र्यंबकेश्वरी जमणाऱ्या नागा साधूंच्या दर्शनाची अभिलाषा बाळगणाऱ्यांनी जरा त्या नागा साधूंविषयीदेखील असेच हिणकस उद्गार काढून पाहावेत. ‘रक्त की नदीयाँ बहेंगी’! दुर्बळांवर वा अहिंसेचा स्वीकार करणाऱ्यांवर वार करण्यात कोणते आले आहे मोठे शौर्य? ‘आमच्या खाण्या-पिण्यावर बंदी आणणारे कोण? आम्हाला घटनेनेच आहार स्वातंत्र्य दिले आहे,’ अशी वकिली करणारे उद्या नरमांसभक्षकही होणार आहेत? होतीलही कदाचित. पण तेव्हा येईल ती राज्यघटना त्यांच्या मदतीला?