शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

अन् फुलली मोसंबीची बाग

By admin | Updated: September 14, 2014 01:32 IST

शिक्षण, उद्योगासह कृषी क्षेत्रतही जिल्हा मागासलेला असल्याचा बाऊ नेहमीच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार करतात.

गोपाल लाजुरकर ल्ल गडचिरोली
शिक्षण, उद्योगासह कृषी क्षेत्रतही जिल्हा मागासलेला असल्याचा बाऊ नेहमीच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार करतात. शेती विकासासाठी जिल्ह्यात जलव्यवस्थापन, सिंचन व इतर संसाधनाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, असा कांगावा नेहमीच केला जातो. फळबागांसाठी पोषक वातावरण नसल्याचे कारणसुद्धा दाखविले जाते. परंतु धानोरासारख्या अतिदुर्गम भागातील जेवलवाही येथे वामन सावसागडे या शेतक:याने पावसाचे पाणी शेतात मुरवून मोसंबीची बाग फुलविली आहे. 
वडिलोपाजिर्त शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेले वामनराव सावसाकडे हे मुळात चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील जामसाडा येथील रहिवासी. शेतीत काम असतानाच त्यांनी उच्च शिक्षण घेऊन विस्तार अधिकारी म्हणून नोकरी मिळविली. परंतु शेतीशी असलेला जिव्हाळा कायम होता. नोकरी करीत असतानाही शेती व्यवसाय करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी धानोरा तालुक्यातील जेवलवाही येथे 1992मध्ये 1क् एकर शेती खरेदी केली. शेताला प्राथमिक गरज असणारी पाण्याची सोय करण्यासाठी शेतात दोन विहिरी खोदल्या. या विहिरींना भरपूर पाणी लागल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. पावसाचे पाणी वाहून वाया जाऊ नये म्हणून शेतात बांध घातले. पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे व संकट काळात पिकांना पाणी मिळावे म्हणून 1क् एकर क्षेत्रत दोन एकरांचा एक व एक एकर क्षेत्रचे पाणी साठवणीचे छोटे तलाव (शेततळे) तयार केले. उताराला असलेल्या शेततळ्यात उंच-सखल भागातून पावसाळ्यात वाहून जाणारा गाळ जमा होण्याची व्यवस्था केली. या गाळाचा उन्हाळ्यात उपसा करून पुन्हा शेतात पसरविला जातो. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत नाही. रासायनिक खतांच्या वापरापेक्षा सुपीक गाळ पिकांच्या संवर्धनासाठी अधिक महत्त्वाची भूमिका बजावितो. याप्रमाणो त्यांनी पावसाचे पाणी व गाळ यांचे योग्य व्यवस्थापन करून धान पिकासह मोसंबीची बाग फुलवली. जमिनीचा पोत कायम राहावा म्हणून पावसाच्या सुरुवातीला बोरू, धैंचा आदी हिरवळीच्या वनस्पतींची लागवड करून वनस्पतीवर फुलोरा येण्याच्या काळात त्या जमिनीत गाडल्या जातात. त्यामुळे शेतात उत्कृष्ट खताची निर्मिती होते. त्यामुळेच शेताच्या सुपीकतेत वाढ होऊन जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
 
वृक्षतोडीमुळे जमिनी ओस पडत आहेत. परिणामी पावसाचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत आहे. याचा परिणाम शेतीवर होऊन उत्पादन घटत आहे. पावसाचे पाणी वापराशिवाय वाहून जाते. शेतात जलसाठे निर्माण करून पाणी जमिनीत मुरविल्यास जमिनीची पाणी ग्रहण क्षमता वाढेल व शेतीलाही फायदा होईल.
- वामन सावसाकडे, शेतकरी, जेवलवाही, ता. धानोरा
 
पोत कायम राहण्यासाठी. जमिनीचा पोत कायम राहावा म्हणून पावसाच्या सुरुवातीला बोरू, धैंचा आदी हिरवळीच्या वनस्पतींची लागवड करून वनस्पतीवर फुलोरा येण्याच्या काळात त्या जमिनीत गाडल्या जातात. त्यामुळे शेतात उत्कृष्ट खताची निर्मिती होते. त्यामुळेच शेताच्या सुपीकतेत वाढ होऊन जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, असे सावसाकडे यांनी सांगितले.
 
च्सावसाकडे यांनी एक एकर शेतीत सहा बाय सहा मीटर अंतरावर न्यूसेलर जातीच्या मोसंबीची लागवड केली आहे.   कृषितज्ज्ञांचा सल्ला तसेच कीडरोग नियंत्रण व व्यवस्थापनामुळे सद्य:स्थितीत मोसंबीची 85 झाडे जिवंत आहेत. झाडांवर खोडकीड अथवा अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ 
नये म्हणून जून व नोव्हेंबर महिन्यात झाडांना बोडरेपेस्ट लावली जाते.
 
च्झाडाभोवतीच्या आळ्यात शेणखत मिसळविले जाते. योग्य व्यवस्थापनामुळे ते दरवर्षी सरासरी साडेतीन टन मोसंबीचे उत्पादन घेत आहेत. बाजारातही मोसंबीला 
5क् रूपये प्रति किलो भाव मिळत असल्याने व्यापारी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.