शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अन् २५ वर्षांपूर्वीच्या आठवणीने पुन्हा उडाला थरकाप!

By admin | Updated: July 31, 2014 11:02 IST

माळीण या गावात ४० घरांवर दरड कोसळल्याची बातमी ऐकली आणि मावळ तालुक्यातील मळवलीनजीकच्या भाजे गावातील २५ वर्षांपूर्वीच्या भीषण घटनेच्या आठवणीने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा थरकाप उडाला.

३७ जणांचा झाला होता मृत्यू : मावळ तालुक्यातील भाजे गावात कोसळली होती दरडभाऊ हुलावळे ल्ल कार्ला (ता. मावळ)आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावात ४० घरांवर दरड कोसळल्याची बातमी ऐकली आणि मावळ तालुक्यातील मळवलीनजीकच्या भाजे गावातील २५ वर्षांपूर्वीच्या भीषण घटनेच्या आठवणीने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा थरकाप उडाला.मळवली रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील छोट्या, पण निसर्गरम्य भाजे गावाचे पर्यटन नकाशावर बुद्ध लेण्यांमुळे ठळक स्थान आहे. याच गावात २३ जुलै १९८९ रोजी असाच निर्सगाचा कोप झाला होता. लेणीच्या अलीकडे असलेल्या टुमदार भाजे गावात झालेल्या जोरदार पावसामुळे सकाळी पावणेसातच्या सुमारास टेकडीचा भाग खचला आणि दगडमातीच्या लोंढ्याने लगतची अनेक घरे आपल्या उदरात घेतली. त्यातील एकूण ३७ जण यात मृत्युमुखी पडले. राऊत कुटुंबातील तब्बल २६ माणसे एकाच वेळी काळाने हिरावून नेली. टेकडीपासून दूर असलेली गावातील इतर घरे बचावलीया घटनेत बचावलेले राऊत कुटुंबातील संदीप राऊत यांना मुसळधार पावसातील घडलेले मृत्यूचे तांडव आठवताना अश्रू आवरत नव्हते. त्या वेळी ते नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते म्हणाले, ‘‘आमचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. माझे आई-वडील, भाऊ, तीन चुलत भाऊ, त्यांची बायका-मुले, चुलते, चुलती, दोन चुलत बहिणी, त्यांची मुले अशी २६ माणसे एकाच वेळी मातीत गाडली गेली. मला एका व्यक्तीने आवाज दिल्याने सुदैवाने वाचलो. एक चुलतभाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता. तोही वाचला. मी वाचलो, पण पुढे काय झाले हे फारसे आठवत नाही.या घटनेचे साक्षीदार माजी सरपंच नंदू पदमुले यांनी सांगितले, की राऊत, टकले, खाटपे, बारमुख या कुटुंबावर त्या दिवशी काळाने घाला घातला. त्या घरांतील कामानिमित्त बाहेर गेलेलेच बचावले. अनेक जनावरेही ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ही घटना घडण्याच्या आदल्या रात्रीपासून धोधो पाऊस सुरू होता. सकाळीच घटना घडल्याने आम्ही सुन्न झालो. कान्हे येथील मोरी वाहून गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. दूरध्वनी यंत्रणा बंद होती. मी स्वत: भाजे ते लोणावळा असा चालत जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यास दुर्घटनेची खबर दिली. त्या नंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. सुदैवाने कार्ल्याजवळ इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाला होता. त्यामुळे ढिगारा बाजूला करण्यासाठीची यंत्रसामग्री घटनास्थळी नेता आली. मदतकार्य कित्येक दिवस सुरू होते. त्या वेळेच्या आठवणींनी आजही थरकाप उडतो.> भाजे लेणीकडे जाणारा रस्ता त्या वेळी पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गेला होता. तत्कालीन महसूल राज्यमंत्री मदन बाफना तालुक्यातीलच असल्याने शासकीय यंत्रणा वेगाने हलत होती. आपद्ग्रस्त १०५ कुटुंबांचे पुनर्वसन प्रत्येकी दीड गुंठा जागा देऊन गावानजीकच्याच सुरक्षित जागेवर करण्यात आले. मृत व्यक्तींच्या वारसांना १५ हजार रुपये देण्यात आले.