शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

दारूमुक्त महामार्गामुळे १० लाख रोजगारांवर टाच

By admin | Updated: April 3, 2017 06:07 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवेपासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर बंदी आली

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवेपासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर बंदी आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील सुमारे १० लाख रोजगारांवर गदा येण्याची भीती हॉटेल मालकांच्या हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाने व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुरू झाल्यानंतर पश्चिम भारतातील सुमारे ३५ हजार रेस्टॉरन्ट आणि बार बंद होतील. त्यामुळे सुमारे १० लाख रोजगार हिरावले जातील. अशा परिस्थितीत हॉटेल चालवणे अशक्य आहे. मुळात हा व्यवसाय सुरू करताना नियमांसह धंद्यातील मर्यादा आणि संधीसह त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो. गुंतवणुकीच्या मानाने या व्यवसायात नगण्य फायदा मिळतो. त्यातही सर्वाधिक मागणी असलेल्या मद्यावरच बंदी घातल्यास संपूर्ण व्यवसायच उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जेमतेम तग धरून असलेली बहुतेक रेस्टॉरंट या नव्या नियमामुळे बंद होण्याची भीती संघटनेचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी व्यक्त केली आहे.राज्यातील १३ हजार ६५५ मद्यविक्री करणाऱ्या बार आणि दुकानांमधील मुंबईतील २९० आणि मुंबई महानगर प्रदेशातील २ हजार बार व दुकाने या निर्णयामुळे बंद होणार असल्याचा दावा संघटनेचे माजी अध्यक्ष कमलेश बारोट यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९ हजार ९२५ रेस्टॉरंट आणि बार यांचा व्यवसाय धोक्यात आला असून त्यामुळे राज्याला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. सद्य:स्थितीत देशातील खाद्य पुरवठा व्यवसायातून ४०८ हजार कोटींचा गल्ला जमत असला, तरी या निर्णयामुळे सुमारे २०० कोटींचा फटका या क्षेत्राला बसेल. या बंदीचा फटका हॉटेल उद्योगाशी निगडित पर्यटन, खाद्य आणि उत्पादन शुल्क विभागाला सहन करावा लागणार आहे. एकंदरीतच पर्यटन क्षेत्रातील ३ कोटी ७४ लाख रोजगारांपैकी सुमारे १० लाख रोजगार कमी होण्याची भीती बारोट यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज!अधिकृतरीत्या परवानाधारक बार आणि रेस्टॉरंट मालक या आदेशाचे पालन करत धंदे बंद किंवा स्थलांतरित करतील. मात्र विनापरवाना मद्यविक्री यापुढेही सर्रासपणे सुरूच राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मद्य सेवन करणारे अशा जागांचा शोध आपसूकच घेतील. त्यामुळे संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह समस्येविरोधात मुळाशी जाऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे. याउलट परवानाधारक हॉटेल्सवर बंदी घातल्याने हा प्रश्न सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया संघटनेचे माजी अध्यक्ष भारत मलकानी यांनी व्यक्त केली.