शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या निषेधार्थ नांगर आंदोलन

By admin | Updated: December 29, 2016 02:02 IST

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करण्यात यावा; या मागण्यांसाठी ५ जानेवारीला अमरावती आयुक्त कार्यालयावर

मुंबई : नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करण्यात यावा; या मागण्यांसाठी ५ जानेवारीला अमरावती आयुक्त कार्यालयावर नांगर आंदोलन छेडण्यात येणार आहे. प्रहार संघटनेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी या आंदोलनाची घोषणा केली. सत्ताधारी शिवसेनेलाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर सरकार नांगर फिरवत असल्याने सरकारला धडा शिकविण्यासाठी नांगर आंदोलन छेडण्यात येणार आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस आणि संत्रा शेतकरी नोटाबंदीमुळे हवालदिल झाले आहेत. संत्रा, कापूस, सोयाबीन तूर व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, पीक कर्जाच्या रकमेत वाढ, २०१४-१५ आणि २०१५-१६पासूनचे ठिबक सिंचनाचे प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने जाहीर करा, आदी मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. स्वामीनाथन आयोग त्वरित लागू करावा, शेतमजुरांना अपघात व आरोग्य विमा द्यावा, पेरणी ते कापणीची सर्व कामे एमआरईजीएसअंतर्गत करावे, अशी मागणीही कडू यांनी केली. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनुसार आंदोलनात सत्ताधारी शिवसेनाही सहभाग घेणार होती. शिवसेना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील झाल्यास त्यांना लवकर न्याय मिळेल. यासाठी सेनेने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. (प्रतिनिधी)