शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

धुळवडीच्या दिवशी रंगाचा भंग! महाराष्ट्रात आठ जणांचा बुडून मृत्यू; रंग खेळून पोहणं जीवावर बेतलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 22:53 IST

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. धुळवड साजरी केल्यानंतर हे तरुण पोहण्यासाठी गेले होते. पण, काळाने त्यांच्यावर झडप घातली.

धुळवडीच्या सणाच्या दिवशी महाराष्ट्रात आठ जणांचा मृत्यू झाला. ठाणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांत या घटना घडल्या आहेत. यात एका १४ वर्षीय युवकाचाही समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झालेले तरुण धुळवड खेलून पोहण्यासाठी गेले होते.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बदलापुरात उल्हास नदीत बुडून चौघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ असलेल्या राहटोली गावाजवळ असलेल्या पोद्दार संकुल आहे. शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी तीन वाजताच्या सुमारास या संकुलातील काही तरुण रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पोहण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात आले होते. 

त्यातील एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाला वाचवताना इतह तीन मित्रही पाण्यात बुडाले. बदलापूर अग्निशामक दलाच्याकडून कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्यांचे मृतदेहर बाहेर काढण्यात आले. 

प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी

सिरोंचा (गडचिरोली) : रंगपंचमीनंतर अंघोळीसाठी प्राणहिता नदीवर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (१४ मार्च) दुपारी २ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर घडली. कामपल्ला राजकुमार (वय २०, रा. वेमनापल्ली जि. मंचेरियाल-तेलंगणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सिरोंचा तालुक्याच्या मोयाबीनपेठा जवळील प्राणहिता नदीच्या पलीकडील भागापासून तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. याच हद्दीतील वेमनापल्ली गावातील कामपल्ली राजकुमार हा तरुण धुळवड खेळून मित्रांसोबत प्राणहिता नदी पात्रात अंघोळीकरिता आला होता. अंघोळ करताना तो खोल पाण्यात गेला. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बुडला. 

१४ वर्षाच्या युवकाचा डोहात बुडून मृत्यू, दुसरा जखमी

आर्वी (वर्धा) : रंग खेळून झाल्यावर नाल्यावर आंघोळीस गेलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा नाका तोंडात पाणी गेल्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

राजवीर संतोष सिंग तवर (वय 14 वर्ष, रा. मायबाई वार्ड) असे मृतक बालकाचे नाव आहे. सुजल गजानन चांदुरकर (वय 17 वर्ष, रा. मायबाई वार्ड) याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. 

धरणात बुडून दोन मावस भावांचा मृत्यू

डोंगरखर्डा (यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणात पोहण्यासाठी आठ जण गेले होते. त्यातील पाच जण बुडत असताना त्यातील तिघांना वाचविण्यात आले, तर दोन मावस भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (१४ मार्च) धुळवड खेळून अंघोळीसाठी दुपारी धरणात उतरले असताना ही घटना घडली.

पंकज अशोकराव झाडे (वय ३५, रा. झाडगाव, राळेगाव), जयंत पंढरी धानफुले (वय २८, रा. मार्डी, ता.मारेगाव) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले होते.

टॅग्स :thaneठाणेYavatmalयवतमाळGadchiroliगडचिरोलीdrowningपाण्यात बुडणे