शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘अमृत’ योजना; ८७ कोटींच्या निविदेचे दर कमी करण्याची सूचना

By admin | Updated: March 3, 2017 02:05 IST

सहा टक्के दर परवडणारे नाहीत!

अकोला, दि.२ : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामांसाठी महापालिकेच्या स्थायी समितीने ६ टक्के जादा दराने मंजूर केलेली निविदा परवडणारी नाही. ‘एपी अ‍ॅन्ड जीपी असोसिएट्स’ कंपनीने किमान ४.७५ दराने निविदा सादर केल्यास विचार केला जाईल, असे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई विभागाने जारी केले आहे. मजीप्राची भूमिका पाहता कंपनी दर कमी करते किंवा नाही, यावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. शहराची पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘अमृत’योजनेत शहराचा समावेश केला. पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर भूमिगत गटार योजनेला सुरु वात केली जाईल. पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या २५४ कोटींच्या ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) मधील ११० कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ८७ कोटी ३५ लाखांच्या कामाची निविदा प्रकाशित केली. एपी अ‍ॅन्ड जीपी असोसिएट्स कंपनीची ६ टक्के ज्यादा दराची निविदा मनपाला प्राप्त झाली. मनपाच्या स्थायी समिती सभेने निविदेला मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीकडे अंतिम मंजुरीसाठी निविदा सादर करण्यात आली. यासंदर्भात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर निर्णय घेतील. यादरम्यान कंपनीने सादर केलेली ६ टक्के जादा दराची निविदा परवडणारी नसल्यामुळे की काय, मुंबई येथील मजीप्राने कंपनीला ४.७५ टक्के दराने निविदा सादर करण्याचे पत्र दिल्याची माहिती आहे. मजीप्राचा प्रस्ताव कंपनीने मान्य केल्यास पाणीपुरवठा योेजनेला सुरुवात होईल. अन्यथा पुन्हा एकदा प्रशासनाला ई-निविदा बोलवावी लागेल, असे दिसून येते. १० कोटींचे काम कधी पूर्ण होईल?२०१२ मध्ये मनपातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-राकाँच्या कालावधीत मूलभूत सोयी-सुविधांसाठी मनपाला २८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. १२ कोटी रुपये जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी तरतूद करण्यात आले. प्रशासनाने ११ कोटी ८४ लक्षची निविदा प्रक्रिया राबवली. १० कोटींचे काम ‘एडीसीसी’ कंपनीला सोपवण्यात आले. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.