ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत, देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निर्माण होईल, त्याची पावले आपण ओळखली पाहिजे. शेतक-याचं दुःख समजून घेऊन अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. महागाव येथे बस स्थानकासमोर हजारो समर्थकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करून पुष्पहार घालताना मा. रविकांत तुपकर, अमर हबीब , डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जि. प. अध्यक्ष भाऊराव चौधरी, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार, अॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीष चव्हाण , प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथुल अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतक-यांसह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते, तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला, तर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.साहेबराव करपे पाटील यांचे पुत्र साहेबराव करपे पाटील यांचे मूळगाव चिलगव्हाण येथे गावक-यांनी चुलबंद ठेवून काळ्या रांगोळ्या काढल्या, सरपंच पंजाबराव पारध, माजी सभापती नरेंद्र खंदारे यांच्यासह गावक-यांनी मंदिरासमोर बसून अन्नत्याग केला. दिवसभर महागाव आणि चिलगव्हाण येथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि करपे कुटुंबापरी आणि शेतकऱ्यांसाठी शासन राबवत असलेल्या धोरणावर संवेदना व्यक्त केल्या. आंदोलनाचे वैशिष्ट्य शेतकरी आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी झटणारे त्यांच्या संघटनाचे प्रतिनिधी महिला आवर्जून उपस्थित होत्या.
अन्नत्याग आंदोलन लोकचळवळ व्हावी- अमर हबीब
By admin | Updated: March 19, 2017 18:02 IST