शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अन्नत्याग आंदोलन लोकचळवळ व्हावी- अमर हबीब

By admin | Updated: March 19, 2017 18:02 IST

अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत, देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निर्माण होईल, त्याची पावले आपण ओळखली पाहिजे. शेतक-याचं दुःख समजून घेऊन अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. महागाव येथे बस स्थानकासमोर हजारो समर्थकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करून पुष्पहार घालताना मा. रविकांत तुपकर, अमर हबीब , डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जि. प. अध्यक्ष भाऊराव चौधरी, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार, अ‍ॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीष चव्हाण , प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथुल अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतक-यांसह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते, तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला, तर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.साहेबराव करपे पाटील यांचे पुत्र साहेबराव करपे पाटील यांचे मूळगाव चिलगव्हाण येथे गावक-यांनी चुलबंद ठेवून काळ्या रांगोळ्या काढल्या, सरपंच पंजाबराव पारध, माजी सभापती नरेंद्र खंदारे यांच्यासह गावक-यांनी मंदिरासमोर बसून अन्नत्याग केला. दिवसभर महागाव आणि चिलगव्हाण येथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि करपे कुटुंबापरी आणि शेतकऱ्यांसाठी शासन राबवत असलेल्या धोरणावर संवेदना व्यक्त केल्या.  आंदोलनाचे वैशिष्ट्य शेतकरी आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी झटणारे त्यांच्या संघटनाचे प्रतिनिधी महिला आवर्जून उपस्थित होत्या.