शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

अन्नत्याग आंदोलन लोकचळवळ व्हावी- अमर हबीब

By admin | Updated: March 19, 2017 18:02 IST

अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत, देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निर्माण होईल, त्याची पावले आपण ओळखली पाहिजे. शेतक-याचं दुःख समजून घेऊन अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. महागाव येथे बस स्थानकासमोर हजारो समर्थकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करून पुष्पहार घालताना मा. रविकांत तुपकर, अमर हबीब , डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जि. प. अध्यक्ष भाऊराव चौधरी, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार, अ‍ॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीष चव्हाण , प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथुल अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतक-यांसह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते, तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला, तर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.साहेबराव करपे पाटील यांचे पुत्र साहेबराव करपे पाटील यांचे मूळगाव चिलगव्हाण येथे गावक-यांनी चुलबंद ठेवून काळ्या रांगोळ्या काढल्या, सरपंच पंजाबराव पारध, माजी सभापती नरेंद्र खंदारे यांच्यासह गावक-यांनी मंदिरासमोर बसून अन्नत्याग केला. दिवसभर महागाव आणि चिलगव्हाण येथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि करपे कुटुंबापरी आणि शेतकऱ्यांसाठी शासन राबवत असलेल्या धोरणावर संवेदना व्यक्त केल्या.  आंदोलनाचे वैशिष्ट्य शेतकरी आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी झटणारे त्यांच्या संघटनाचे प्रतिनिधी महिला आवर्जून उपस्थित होत्या.