शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

अमरावती, वर्धेत बंडखोरांच्या मदतीने काँग्रेस, भाजपला सत्ता

By admin | Updated: September 22, 2014 00:51 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अमरावती, वर्धा व यवतमाळ येथे सत्ताधारी आघाडी-युतीमध्ये बदल झाला. त्यापैकी अमरावती येथे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले,

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अमरावती, वर्धा व यवतमाळ येथे सत्ताधारी आघाडी-युतीमध्ये बदल झाला. त्यापैकी अमरावती येथे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले, तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके यांचा गट महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे सत्तेत कायम राहिला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का समजला जात आहे. वर्धेत माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर सत्ता गमावण्याची पाळी आली. काँग्रेसला नागपूर, चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ येथे दिलासा देणारी घटना घडून राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी असलेला घरोबा मोडला. नागपूर व चंद्रपूर येथे भाजप आणि गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची सत्ता कायम राहिली.नागपूर जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश आले. अध्यक्षपदी भाजपच्या निशा सावरकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड करण्यात आली. सावरकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शालू हटवार यांचा तर डोनेकर यांनी उज्ज्वला बोढारे यांचा पराभव केला. युतीच्या बाजूने ३२ तर आघाडीच्या उमेदवारांना २६ मते पडली. गेल्या वेळी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. जि.प.च्या ५८ सदस्यात युतीचे २९ सदस्य असून रिपाइं, बसपा आणि गोगपाचा प्रत्येकी एक अशा तीन सदस्यांनी युतीला साथ दिल्याने संख्याबळ ३२ झाले.अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष तर, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचे सतीश हाडोळे हे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी बंडखोरी करुन स्वतंत्र वऱ्हाड विचार मंच या नावाने गट स्थापन केल्याने राष्ट्रवादीला जबर धक्का बसला, हे विशेष.अमरावती जिल्हा परिषदेत ५९ सदस्य संख्या असून अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सतीश उईके तर भाजपचे जयप्रकाश पटेल यांचे नामांकन दाखल होते. मात्र जयप्रकाश पटेल यांनी कागदपत्रांची योग्य पूर्तता केली नसल्याने पटेल यांचा अर्ज खारीज केला तसेच उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज भाजपचे जयप्रकाश पटेल व शिवसेनेचे कृष्णराव पवार यांनी अर्ज मागे घेतले. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, प्रहारचे सदस्य व बसपाचे अभिजित ढेपे हे अनुपस्थित होते. सदस्यांच्या पळवापळवी करून वर्धेत भाजपाने काँग्रेसकडून सत्ता हिसकाविला. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपाने सर्वशक्तिनिशी जिल्हा परिषदेची सत्ता बळकावल्याने आघाडीला मोठा हादरा बसला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाच्या चित्रा रणनवरे आणि काँग्रेसच्या उषाकिरण थुटे यांच्यात झालेल्या सरळ लढतीत थुटे यांचा पराभव केला, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे विलास कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कामनापुरे यांच्यात सरळ लढत झाली. यात कामनापुरे यांचा पराभव झाला. भाजपाच्या नेत्यांनी एकत्रितपणे दत्ता मेघे यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढली आणि सत्ता हस्तगत केली. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुफाटे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांची रविवारी निवड करण्यात आली. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी अडीच वर्ष राष्ट्रवादी, सेना, भाजपाची युती होती. मात्र यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली. राष्ट्रवादीच्यावतीने अध्यक्षपदासाठी डॉ. आरती फुफाटे यांनी तर त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या मंदा गाडेकर यांनी आणि उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब मांगुळकर यांच्याविरुद्ध भाजपाचे अमन गावंडे यांंनी अर्ज दाखल केला. चंद्रपुरात भाजप पुन्हा सत्तेवर आली असूृन अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी कल्पना बोरकर विजयी झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी गुरनुले यांना ३० मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँंग्रेसच्या ज्योती जयस्वाल यांना २६ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्पना बोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर बोडलावार यांचा ३० विरूद्ध २६ अशा मतांनी पराभव केला. काँगे्रसच्या चित्रा डांगे यांनी सभागृहात उपस्थित राहूनही तठस्थ भूमिका घेत मतदान करण्याचे टाळले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पंकज पवार यांनी भाजपाला मतदान केल्याने काँग्रेस-राकॉ आघाडीला दोन मतांचा फटका बसला. गेल्या वेळीही भाजपाने मित्रपक्षांच्या विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अध्यक्षपद मिळवून सत्ता आपल्याकडे राखली होती. मात्र यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत राहण्याचे ठरविले.गडचिरोलीत गेल्यावेळी या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशी सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य जीवन पाटील नाट निवडून आले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुत्तरमारे यांना २८ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या वर्षा कौशिक यांना २२ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जीवन नाट यांना २८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य अतुल गण्यारपवार यांना २० मते मिळाली. मतदानाला एक सदस्य गैरहजर होता तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन सदस्य तटस्थ राहिले. (प्रतिनिधी)