शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमरावती विभागातील पर्जन्यमापक यंत्रांची होणार दुरुस्ती!

By admin | Updated: April 21, 2017 00:28 IST

अकोला- यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत.

संतोष येलकर - अकोलायंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत. यासंबंधी विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची अचूक नोंद करण्यासाठी सन २०१३ मध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यांत महसूल मंडळ स्तरावरील गावांमध्ये शासनामार्फत पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत या पर्जन्यमापक यंत्रांद्वारे पडणाऱ्या पावसाची नोंद दररोज संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत घेतली जाते. पर्जन्यमापक यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीची माहिती दररोज तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासनाकडे सादर केली जाते.या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित आहेत की नाहीत, याबाबतची पडताळणी करून तांत्रिक बिघाड असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांच्या दुरुस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पर्जन्यमापक यंत्रांचे पाणीपात्र आणि ‘मेजरिंग ग्लास’च्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.