शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

आकस्मिकता निधीतून काढलेल्या रकमेचा वापर मात्र नगण्यच

By admin | Updated: April 14, 2016 01:09 IST

अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक

मुंबई : अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेषत: नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या रकमा या निधीतून काढण्यात आल्या. मात्र, त्यांचा वापर अनुक्रमे १२.२६ टक्के, ६.८७ टक्के आणि १७.१६ टक्के इतकाच करण्यात आला. त्यातील पहिल्या दोन रकमा या आघाडी सरकारच्या काळातील तर नंतरची २ हजार कोटी रुपयांची रक्कम विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील आहे. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या निधीचा वापर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांतच अधिक केला जातो हा आजवरचा अनुभव आहे. सध्याचे सरकारही त्याला अपवाद ठरलेले नाही. शेवटच्या तीन महिन्यांत केलेली खर्चाची विविध विभागांनी कशी घाई केली याची पानभर आकडेवारीच अहवालात देण्यात आली आहे.पुरवणी मागण्या गेल्या काही वर्षांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत आणि त्यावर टीकाही होत आली आहे. एखाद्या विभागासाठीची मूळ अर्थसंकल्पीय तरतूद शिल्लक असतानाही पुरवणी मागण्यांद्वारे आणखी तरतूद करण्यात आल्याची बाबही अहवालात समोर आली आहे. या विभागांची १६ हजार २२ कोटी रुपयांची तरतूद शिल्लक असताना पुरवणीद्वारे १२ हजार ५८६ कोटी रुपयांची तरतूद करणे अनावश्यक होते, असा शेरा अहवालात मारण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)आकस्मिकता निधी व त्याचा वापर (रक्कम कोटी रु.मध्ये)निधी मंजुरी दि.विभाग व उद्देशमंजूर निधीवापरलेली रक्कम५ एप्रिल २०१४नैसर्गिक आपत्ती ८५०१०४.१८ (१२.२६%)१३ एप्रिल १४नैसर्गिक आपत्ती १५००१०३.११ (६.८७%)३० आॅगस्ट १४शिक्षण, कला, क्रीडा१.००० (०%)२० नोव्हेंबर १४इतर प्रशासनिक सेवा०.२२०.१६ (७२.७३%)२४ नोव्हेंबर १४वनीकरण व वन्यजीव१००० (०%)१९ जानेवारी १५वनीकरण व वन्य जीव३२.८८ (९६%)२९ जानेवारी १५मोठे, मध्यम सिंचन०.०३०० (०%)२ फेब्रुवारी १५नैसर्गिक आपत्ती निवारण२०००३४३.२३((१७.१६)