शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

समान पाणी योजनेच्या निविदेत गैरव्यवहार

By admin | Updated: July 13, 2017 01:02 IST

समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधकांनी केला. सर्व निविदा निश्चित रकमेपेक्षा सरासरीने २६ टक्के दराने जास्त असल्याने यात प्रशासनही सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. १ हजार ७४८ कोटी रुपयांचे हे काम आहे व जादा दरामुळे त्यात महापालिकेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हा आरोप केला. शिंदे यांनी याआधीच कोणत्या चार कंपन्या यात निविदा दाखल करणार आहेत ते जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्याच चार कंपन्यांनी या निविदा दाखल केल्या आहेत. १ हजार ७४८ कोटी रुपयांच्या एकाच प्रकारच्या कामाचे चार तुकडे करून त्याप्रमाणे निविदा मागवण्यात आल्या होत्या. चार कंपन्यांनी प्रत्येक कामासाठी प्रत्येकी चार निविदा दाखल केल्या. त्यात चौघांपैकी एकाने प्रत्येक कामात दुसऱ्यापेक्षा कमी दराने, पण एकूण कामापेक्षा जास्त दराची अशी निविदा दाखल केली. त्यामुळे दाखवण्यासाठी स्पर्धाही झाली व प्रत्येकाला कामही मिळाले. हे सर्व प्रशासन व अधिकारी यांच्या संगनमतातून ठरवून झाले असल्याचे तुपे व शिंदे म्हणाले. प्रत्येक निविदा साधारण २६ टक्के जादा दराने आलेली आहे. महापालिकेला त्याच्या एकूण कामात ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.>फेरनिविदा काढावीकात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची जादा दराने आलेली निविदा राज्य सरकारने हस्तक्षेप करून रद्द करायला लावली. आता या त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च असलेल्या कामाच्या निविदेतही सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी तुपे, शिंदे यांनी केली. या संपूर्ण कामाची फेरनिविदा काढावी, अशी मागणी त्यांनी केली. पारदर्शकता शब्दाचा योग्य वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही संधी आहे, असे ते म्हणाले. सरकारने दखल घेतली नाही, तर या निविदा प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.>पाणी योजनेसारखी कामे दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळेच कंपन्या त्याचा विचार करून जादा रकमेच्या निविदा दाखल करतात. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात भामा आसखेड किंवा पर्वती जलशुद्धीकरणाच्या निविदाही ३० टक्के जादा दराने आल्या होत्या.- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती>धनकवडी : येथील राजे चौक परिसरात बुधवारी सायंकाळी ४ वाजता जलवाहिनीवर बसवण्यात आलेला प्रेशर व्हॉल्व्ह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुरुस्त करीत असताना हजारो लिटर पाणी वाया गेले. उताराकडे येणाऱ्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीमधील पाणी दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून वाहून गेले.प्रेशर व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे आंबेगाव पठार परिसराला पाणीपुरवठा होणार नव्हता. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. खोदाई करून व्हॉल्व्हची पाहणी केल्यावर, त्यातील महत्त्वाचा भाग निकामी झाल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण व्हॉल्व्ह खोलून वर काढताच जलवाहिनीतील शिल्लक साठलेले पाणी मोठ्या दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून लोट वाहू लागले. त्यानंतर तळजाई पाण्याच्या टाकी परिसरातील व्हॉल्व्ह बंद करण्यात आला. दरम्यान, जलवाहिनीत साठलेले पाणी तासाभरात हजारो लिटर वाहून गेले. काही दुकानांसमोर पाण्याची तळी साठली होती.