शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

समान पाणी योजनेच्या निविदेत गैरव्यवहार

By admin | Updated: July 13, 2017 01:02 IST

समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधकांनी केला. सर्व निविदा निश्चित रकमेपेक्षा सरासरीने २६ टक्के दराने जास्त असल्याने यात प्रशासनही सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. १ हजार ७४८ कोटी रुपयांचे हे काम आहे व जादा दरामुळे त्यात महापालिकेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हा आरोप केला. शिंदे यांनी याआधीच कोणत्या चार कंपन्या यात निविदा दाखल करणार आहेत ते जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्याच चार कंपन्यांनी या निविदा दाखल केल्या आहेत. १ हजार ७४८ कोटी रुपयांच्या एकाच प्रकारच्या कामाचे चार तुकडे करून त्याप्रमाणे निविदा मागवण्यात आल्या होत्या. चार कंपन्यांनी प्रत्येक कामासाठी प्रत्येकी चार निविदा दाखल केल्या. त्यात चौघांपैकी एकाने प्रत्येक कामात दुसऱ्यापेक्षा कमी दराने, पण एकूण कामापेक्षा जास्त दराची अशी निविदा दाखल केली. त्यामुळे दाखवण्यासाठी स्पर्धाही झाली व प्रत्येकाला कामही मिळाले. हे सर्व प्रशासन व अधिकारी यांच्या संगनमतातून ठरवून झाले असल्याचे तुपे व शिंदे म्हणाले. प्रत्येक निविदा साधारण २६ टक्के जादा दराने आलेली आहे. महापालिकेला त्याच्या एकूण कामात ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.>फेरनिविदा काढावीकात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची जादा दराने आलेली निविदा राज्य सरकारने हस्तक्षेप करून रद्द करायला लावली. आता या त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च असलेल्या कामाच्या निविदेतही सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी तुपे, शिंदे यांनी केली. या संपूर्ण कामाची फेरनिविदा काढावी, अशी मागणी त्यांनी केली. पारदर्शकता शब्दाचा योग्य वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही संधी आहे, असे ते म्हणाले. सरकारने दखल घेतली नाही, तर या निविदा प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.>पाणी योजनेसारखी कामे दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळेच कंपन्या त्याचा विचार करून जादा रकमेच्या निविदा दाखल करतात. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात भामा आसखेड किंवा पर्वती जलशुद्धीकरणाच्या निविदाही ३० टक्के जादा दराने आल्या होत्या.- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती>धनकवडी : येथील राजे चौक परिसरात बुधवारी सायंकाळी ४ वाजता जलवाहिनीवर बसवण्यात आलेला प्रेशर व्हॉल्व्ह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुरुस्त करीत असताना हजारो लिटर पाणी वाया गेले. उताराकडे येणाऱ्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीमधील पाणी दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून वाहून गेले.प्रेशर व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे आंबेगाव पठार परिसराला पाणीपुरवठा होणार नव्हता. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. खोदाई करून व्हॉल्व्हची पाहणी केल्यावर, त्यातील महत्त्वाचा भाग निकामी झाल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण व्हॉल्व्ह खोलून वर काढताच जलवाहिनीतील शिल्लक साठलेले पाणी मोठ्या दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून लोट वाहू लागले. त्यानंतर तळजाई पाण्याच्या टाकी परिसरातील व्हॉल्व्ह बंद करण्यात आला. दरम्यान, जलवाहिनीत साठलेले पाणी तासाभरात हजारो लिटर वाहून गेले. काही दुकानांसमोर पाण्याची तळी साठली होती.