शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

घरोघरी हवेत अमिताभ, शाहरुख!

By admin | Updated: April 15, 2015 00:55 IST

चित्रपटाविषयी ग्लॅमरचे मुलांना आकर्षण असो की नसो, पण पालकांना मात्र आपल्या मुलाने अमिताभ, शाहरुख खान व्हावे, अगदीच नाही तर छोट्या पडद्यावरील ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये झळकावे,

पुणे : चित्रपटाविषयी ग्लॅमरचे मुलांना आकर्षण असो की नसो, पण पालकांना मात्र आपल्या मुलाने अमिताभ, शाहरुख खान व्हावे, अगदीच नाही तर छोट्या पडद्यावरील ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये झळकावे, असे वाटत असते. त्यामुळे सुट्टीचा मोसम सुरू झाल्याबरोबर मुलांना अभिनय आणि नृत्य शिबिरांना पाठविण्यात सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. एक काळ असा होता की शाळांना ‘उन्हाळी’ सुट्या लागल्या की, मुले ‘मामाच्या गावाला जायची’ किंवा मैदानी अथवा कॅरम, पत्ते यासारख्या बैठ्या खेळांमध्ये गुंतायची. मात्र, आता सुट्टीच्या काळातही मुलाने काहीतरी शिकावे, या कल्पनेने पालक सुट्टीच्या आधीपासून विचारात गढलेले असतात. उन्हाळी शिबिरांची संख्या वाढत आहे. नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या अशा शिबिरांना पाठविण्याचा ओढा वाढला आहे. त्यातही आता चित्रपट आणि जाहिरातींमध्ये साततत्याने झळकणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यांमुळे आणि नृत्यविषयक ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे ‘अभिनय आणि नृत्य’ शिबिरांना पालकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली असून, ही शिबिरे जवळपास ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय-नाट्य शिबिरे तसेच कार्यशाळांचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. शिबिरांच्या चौकशीसाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे. पैसा आणि प्रसिद्धीच्या चक्रव्यूहात पालकांची मानसिकता गुरफटत चालल्याचे हे काही अंशी द्योतक मानता येईल. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले याबाबत म्हणाल्या, ‘कला’ ही अंगभूत असावी लागते, ती प्रत्येकातच असते. केवळ गरज असते ती त्या कलेला वाव देण्याची. त्यादृष्टीने ही शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण आपल्या मुलाचा कल कुठे आहे, हे पाहूनच त्याला योग्य त्या शिबिरात घालणे आवश्यक आहे. आपल्याला वाटते म्हणून पालकांनी मुलांना विशिष्ट शिबिरांना पाठविणे चुकीचे आहे. नेमके सध्या हेच होत आहे. शिबिरे हा व्यक्तिमत्त्व विकासाचा एक भाग असतो. ७ किंवा १० दिवसांत कोणताही मुलगा अभिनेता किंवा अभिनेत्री होऊ शकत नाही. तरीही या शिबिराद्वारे आपली मुले जाहिरातीत झळकतील किंवा चित्रपटांत दिसतील हा पालकांचा समजच योग्य नाही. मुलांमधील कलागुण विकसित व्हावेत, आत्मविश्वास वाढावा, संवादकौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश असायला हवा. (प्रतिनिधी)४मुलांचा कल नक्की कशात आहे हे पाहून मुलांना अशा शिबिरांना पाठविले जावे. आपल्या मुलांना व्यावसायिक संधी तातडीने मिळावी अशी पालकांची अपेक्षा असते. पण अशी उन्हाळी शिबिरे ही अभिनयाची ओळख करून देण्यापुरती असतात. मुलांना खरच या क्षेत्रात पाठवायचे असेल तर पालक आणि मुले दोघांनाही संघर्ष करावा लागतो. मुलांना विविध ठिकाणी आॅडिशन्सला न्यावे लागते, मुलांमध्ये क्षमता असेल तर नक्कीच संधी मिळते, पण त्यासाठी संयमाची आवश्यकता असल्याचे अभिनेत्री आणि अभिनय अ‍ॅकॅडमी संचालक मधुराणी प्रभुलकर हिने स्पष्ट केले.रिअ‍ॅलिटी शोची जणू जत्राच भरलीयमराठी चित्रपटसृष्टीत लहान मुलांशी संबंधित चित्रपटांनी यशाची शिखरे गाठली आहेत. जाहिरातींमध्येही मुले चमकत आहेत, विविध वृत्तवाहिन्यांवर नृत्याशी निगडित ‘रिअ‍ॅलिटी शो’ची जत्राच भरल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टी कमीतकमी वेळेत झटपट प्रसिद्धी देणाऱ्या असल्यामुळे पालकांचा कल अशा शिबिरांकडे वाढत असल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.