शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

अमित शहांची डायरी खटल्यांनी भरलेली - शरद पवार

By admin | Updated: September 6, 2014 17:41 IST

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची ओळख काय तर त्यांची डायरी बघितली तर ती तुम्हाला अनेक खटल्यांनी भरलेली आढळेल असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची ओळख काय तर त्यांची डायरी बघितली तर ती तुम्हाला अनेक खटल्यांनी भरलेली आढळेल असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाजपावर तोंडसुख घेतले. अमित शहांना वाचवण्याची किंमत म्हणून की काय सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना राज्यपालपद देण्यात आले अशी टीका करताना, राष्ट्रपतींना शपथ देण्याचा मान असतो त्या पदावरील व्यक्तिने राज्यपालपद स्वीकारून त्या पदाचा अवमान केल्याची टीका सदाशिवम यांच्यावर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते भाजपात गेल्याचा उल्लेख करताना यापुढे या लोकांची चर्चापण करू नका असे सांगताना ते गेले आणि आपण सुटलो अशी भावना पवारांनी व्यक्त केली. त्यांची पुढे खिल्ली उडवताना दसरा संमेलनामध्ये या नेत्यांना संघाची अर्धी चड्डी घालून संचलनात बघायची इच्छा असल्याचंही पवार म्हणाले. मोदी लाटेचा राज्यावर काय परिणाम होईल हे सांगताना केंद्राचा निकाल व राज्याचा निकाल एकच असतो असं नाही असं सांगतना वाजपेयी पंतप्रधान झाले त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचीच सत्ता आली होती याची आठवण पवारांनी करून दिली. 
महिलांना संपत्तीत वाटा, आरक्षण, पोलीस खात्यात समावेश, वीज खात्यात लाइन वुमन अशा अनेक प्रकारे महिलांना पुढे करण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आणि सगळ्या देशाला दिशा आपण दाखवली असं पावर म्हणाले. अल्पसंख्याकांबद्दल बोलताना पवार म्हणाले की एकंदर समाजाचा विचार करता मुस्लीमांमध्ये व आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. त्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागेल, योजना आखायला लागतिल यासाठी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता यायला हवी.
महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर आहे, परंतु समतोल विकास झाल्याचं समाधान नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. राज्यातल्या अनेक प्रांतामध्ये उद्योग नसून ते आणण्यासाठी आपल्याला सत्ता हवी असं पवार म्हणाले. कृषिक्षेत्रासाठी राष्ट्रवादीने व काँग्रेसनेच काम केल्याचं सांगताना पवार म्हणाले की अर्थपुरवठा १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत व काही प्रमाणात शून्य टक्क्यांपर्यंत आणण्याचं काम महाराष्ट्रानं व विशेषत: राष्ट्रवादीने केलंय.
सबंध देशातली सिंचनाखालील जमीन ४० टक्के आहे, तर महाराष्ट्रात हा आकडा अवघा १७ टक्के असल्याचं पवार म्हणाले. शेतीचं उत्पन्न आपण निश्चितच वाढवलंय, आधी आपण आयात करायचो तर आता तांदूळ, गहू, कापूस व साखरीमध्ये निर्यातीत आपण एक व दोन क्रमांकावर असल्याचं सांगताना महाराष्ट्राचं योगदान असल्याचं पवार यांनी सांगितलं. कुणी आमदार व्हावं, मंत्री व्हावं एवढा सीमित या निवडणुकांचा अर्थ नसून महाराष्ट्राची ताकद देशाच्या कामाला यायला हवी हा निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचं सांगत सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन पावारांनी केलं.