शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अमित देशमुख यांना कोर्टाचा दिलासा

By admin | Updated: January 23, 2017 04:42 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून राज्य विधानसभेवर झालेल्या निवडीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले अमित देशमुख प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यांच्याकडून परभूत झालेले आणि अवघी ४०० मते मिळून अनामत रक्कमही जप्त झालेले अपक्ष उमेदवार अण्णाराव गोविंदराव पाटील यांनी देशमुख यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या वर्षी १८ जुलै रोजी पाटील यांची याचिका फेटाळली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाला २८ लाख रुपयांची कमाल मर्यादा ठरलेली आहे. असे असूनही अमित देशमुख यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून, या मर्यादेहून कितीतरी जास्त खर्च करून निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब केला, असा पाटील यांचा आरोप होता, परंतु पाटील यांनी केवळ असे प्रतिपादन करण्याखेरीज आपल्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असे उच्च न्यायालयाने नमूद केले होते. या निकालाविरुद्ध पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली. तेथेही न्या. रंजन गोगोई व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने पाटील यांचे अपील फेटाळले. उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आम्हाला कोणतेही कायदेशीर व वैध कारण दिसत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील के. के. वेणूगोपाळ व अ‍ॅड. दिलीप तूर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)