शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अमित देशमुख यांना कोर्टाचा दिलासा

By admin | Updated: January 23, 2017 04:42 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून राज्य विधानसभेवर झालेल्या निवडीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले अमित देशमुख प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यांच्याकडून परभूत झालेले आणि अवघी ४०० मते मिळून अनामत रक्कमही जप्त झालेले अपक्ष उमेदवार अण्णाराव गोविंदराव पाटील यांनी देशमुख यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या वर्षी १८ जुलै रोजी पाटील यांची याचिका फेटाळली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाला २८ लाख रुपयांची कमाल मर्यादा ठरलेली आहे. असे असूनही अमित देशमुख यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून, या मर्यादेहून कितीतरी जास्त खर्च करून निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब केला, असा पाटील यांचा आरोप होता, परंतु पाटील यांनी केवळ असे प्रतिपादन करण्याखेरीज आपल्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असे उच्च न्यायालयाने नमूद केले होते. या निकालाविरुद्ध पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली. तेथेही न्या. रंजन गोगोई व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने पाटील यांचे अपील फेटाळले. उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आम्हाला कोणतेही कायदेशीर व वैध कारण दिसत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील के. के. वेणूगोपाळ व अ‍ॅड. दिलीप तूर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)