शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आमीर करणार ‘जलयुक्त’चा प्रचार

By admin | Updated: February 18, 2016 07:08 IST

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि आमिर यांनी संयुक्त पत्र परिषदेत ही माहिती दिली.जलयुक्त शिवार योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना आमिर यांच्या फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप प्रदान करण्यात येतील. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यांतील गावांची स्पर्धा पहिल्या टप्प्यात प्रायोगिक स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यसाठी पहिले बक्षीस ५० लाख, द्वितीय ३० लाख तर तृतीय बक्षीस २० लाखांचे असेल. ३०० गावांत ही स्पर्धा होईल. प्रत्येक गावात ग्रामसभेने निवडलेल्या पाच जणांची निवड प्रशिक्षणासाठी होईल. (विशेष प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजना ही लोकचळवळ व्हावी यासाठी टीव्ही, रेडिओ आणि सर्व प्रकारच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून व्यापक जागृती केली जाईल. या योजनेच्या यशोगाथा दाखविल्या जातील. - आमीर खान आमिर यांनी मध्यंतरी घेतलेल्या भूमिकेवर आता ‘जलयुक्त’मधील त्यांच्या सहभागानिमित्ताने पडदा टाकण्यात आला आहे का, असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, काही विषय वादांच्या पलिकडचे असतात व काही बातम्या या सकारात्मकदेखील असाव्यात. आमिर खान यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्याची गरज नाही. आमच्याकडे पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ यांच्यासारखे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आधीपासूनच आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी तो विषय टोलविला.आमिर खान यांना जलयुक्त शिवार योजनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्याचे आधी ठरले होते. मात्र, आमिर यांनी मध्यंतरी असहिष्णुतेच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे तसे करण्याचे टाळण्यात आले, अशी चर्चा आहे.