शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आमीर करणार ‘जलयुक्त’चा प्रचार

By admin | Updated: February 18, 2016 07:08 IST

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि आमिर यांनी संयुक्त पत्र परिषदेत ही माहिती दिली.जलयुक्त शिवार योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना आमिर यांच्या फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप प्रदान करण्यात येतील. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यांतील गावांची स्पर्धा पहिल्या टप्प्यात प्रायोगिक स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यसाठी पहिले बक्षीस ५० लाख, द्वितीय ३० लाख तर तृतीय बक्षीस २० लाखांचे असेल. ३०० गावांत ही स्पर्धा होईल. प्रत्येक गावात ग्रामसभेने निवडलेल्या पाच जणांची निवड प्रशिक्षणासाठी होईल. (विशेष प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजना ही लोकचळवळ व्हावी यासाठी टीव्ही, रेडिओ आणि सर्व प्रकारच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून व्यापक जागृती केली जाईल. या योजनेच्या यशोगाथा दाखविल्या जातील. - आमीर खान आमिर यांनी मध्यंतरी घेतलेल्या भूमिकेवर आता ‘जलयुक्त’मधील त्यांच्या सहभागानिमित्ताने पडदा टाकण्यात आला आहे का, असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, काही विषय वादांच्या पलिकडचे असतात व काही बातम्या या सकारात्मकदेखील असाव्यात. आमिर खान यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्याची गरज नाही. आमच्याकडे पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ यांच्यासारखे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आधीपासूनच आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी तो विषय टोलविला.आमिर खान यांना जलयुक्त शिवार योजनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्याचे आधी ठरले होते. मात्र, आमिर यांनी मध्यंतरी असहिष्णुतेच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे तसे करण्याचे टाळण्यात आले, अशी चर्चा आहे.