शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

आंबोली पृथ्वीवरील स्वर्ग

By admin | Updated: July 1, 2016 00:00 IST

आंबोलीतल्या धबधब्यातील पाण्यात आणि डब्यात बेडकाचं नेहमीच दर्शन होतं. डराव डराव करत अनेकांचं लक्ष वेधणारा हा प्राणी पावसाळ्यात जागोजागी पाहायला मिळतो.आंबोलीत गेल्यावर चिखलात उमललेलं कमळ पाहिल्यास डोळ्यांचं पारणं फिटल्याचा अनुभव येतो. या नयनरम्य दृश्यानं मन आनंदित होते.कावळेसाद हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. प्रचंड खोल दरी आणि चारी बाजूनी डोंगर असं ...

आंबोलीतल्या धबधब्यातील पाण्यात आणि डब्यात बेडकाचं नेहमीच दर्शन होतं. डराव डराव करत अनेकांचं लक्ष वेधणारा हा प्राणी पावसाळ्यात जागोजागी पाहायला मिळतो.

आंबोलीत गेल्यावर चिखलात उमललेलं कमळ पाहिल्यास डोळ्यांचं पारणं फिटल्याचा अनुभव येतो. या नयनरम्य दृश्यानं मन आनंदित होते.

कावळेसाद हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. प्रचंड खोल दरी आणि चारी बाजूनी डोंगर असं कावळेसाद ठिकाण अनेकांना आकर्षित करतं. असं म्हणतात एखादं जनावर दरीत पडतं (पडतं म्हणजे त्याची शिकार होते) त्यावेळेस कावळे दरीच्या तोंडाशी एकत्र कलकलाट करतात. त्यातून या ठिकाणाला कावळेसाद हे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.

आंबोलीच्या पश्चिमेला महादेवगड उत्तरेला मनोहरगड हे किल्ले आहेत. तर मलईचे जंगल सनसेट पॉईंट नांगरकासा धबधबा अशी प्रेक्षणीय पर्यटकांच्या पसंतीस उतरतात.

अनेक जातीचे सर्प आंबोलीत पाहायला मिळतात. पावसाळ्यात सापटोळी घोणस मनियार सारख्या जातीचे साप दृष्टिक्षेपात पडतात. त्यामुळे इथं जाताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून होते. नदीच्या उगमाजवळ हिरण्यकेशीचे मंदिर आणि आश्रम आहे. मंदिरातील हिरण्यकेशीची मूर्ती सुबक आणि सुंदर आहे तिच्याशेजारीच शंकराची पिंडी आहे आणि त्याच्या बाजूस गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. इथे एक रहस्यमय गुहा देखील आहे.

आंबोलीत गेल्यास परीक्षित ठिकाण पर्यटकांना आवर्जून खुणावतं. या ठिकाणांहून सूर्यास्त पाहिल्यास मन प्रफुल्लित होतं. पावसाळ्यात आंबोलीला गेल्यास स्वर्गात गेल्याचाच भास होतो.

कोकणातील सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणजे सिंधुदुर्गातील आंबोली घाट. 690 मीटर उंचीवर असलेला आंबोली घाट हा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आंबोलीत गेल्यावर आजूबाजूला सगळीकडे निसर्गानं पांघरलेला हिरवा शालू आणि पानांवरील दवबिंदू लक्ष वेधतात.