शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

‘मानवतावादी राज्यघटनेतून आंबेडकरांनी ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली’

By admin | Updated: April 12, 2016 02:45 IST

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर

पुणे : स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी राज्यघटनेतून खऱ्या अर्थाने एकसंघ राष्ट्र झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्ताने महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंगातील छायाचित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची लढाई’ या विषयावर साहित्यिक डॉ. शैलेश त्रिभुवन व कवी उद्धव कानडे यांनी डॉ. कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेतली. विवेकानंद दिवाकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटी व सहवासाच्या आठवणी सांगितल्या. धर्मावर आधारित राष्ट्रउभारणी अशक्यडॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सरंजामी व जाती व्यवस्थेमुळे माणूस म्हणून समता व न्याय यांचे अस्तित्वच नव्हते. सर्वच नागरिकांना माणूस म्हणून समान अधिकार, न्याय व बंधुत्वाने जगता यावे म्हणून बाबासाहेबांनी जात, धर्म व लिंगभेद विरहित मानवतावादी राज्यघटना तयार केली आहे. धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी शक्य नाही आणि तसे प्रयत्न झाल्यास देश पुन्हा जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीत जाईल. (प्रतिनिधी)