शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

‘मानवतावादी राज्यघटनेतून आंबेडकरांनी ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली’

By admin | Updated: April 12, 2016 02:45 IST

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर

पुणे : स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी राज्यघटनेतून खऱ्या अर्थाने एकसंघ राष्ट्र झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्ताने महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंगातील छायाचित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची लढाई’ या विषयावर साहित्यिक डॉ. शैलेश त्रिभुवन व कवी उद्धव कानडे यांनी डॉ. कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेतली. विवेकानंद दिवाकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटी व सहवासाच्या आठवणी सांगितल्या. धर्मावर आधारित राष्ट्रउभारणी अशक्यडॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सरंजामी व जाती व्यवस्थेमुळे माणूस म्हणून समता व न्याय यांचे अस्तित्वच नव्हते. सर्वच नागरिकांना माणूस म्हणून समान अधिकार, न्याय व बंधुत्वाने जगता यावे म्हणून बाबासाहेबांनी जात, धर्म व लिंगभेद विरहित मानवतावादी राज्यघटना तयार केली आहे. धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी शक्य नाही आणि तसे प्रयत्न झाल्यास देश पुन्हा जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीत जाईल. (प्रतिनिधी)