शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

‘मानवतावादी राज्यघटनेतून आंबेडकरांनी ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली’

By admin | Updated: April 12, 2016 02:45 IST

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर

पुणे : स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी राज्यघटनेतून खऱ्या अर्थाने एकसंघ राष्ट्र झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्ताने महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंगातील छायाचित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची लढाई’ या विषयावर साहित्यिक डॉ. शैलेश त्रिभुवन व कवी उद्धव कानडे यांनी डॉ. कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेतली. विवेकानंद दिवाकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटी व सहवासाच्या आठवणी सांगितल्या. धर्मावर आधारित राष्ट्रउभारणी अशक्यडॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सरंजामी व जाती व्यवस्थेमुळे माणूस म्हणून समता व न्याय यांचे अस्तित्वच नव्हते. सर्वच नागरिकांना माणूस म्हणून समान अधिकार, न्याय व बंधुत्वाने जगता यावे म्हणून बाबासाहेबांनी जात, धर्म व लिंगभेद विरहित मानवतावादी राज्यघटना तयार केली आहे. धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी शक्य नाही आणि तसे प्रयत्न झाल्यास देश पुन्हा जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीत जाईल. (प्रतिनिधी)