शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

आधीच दुष्काळ, त्यात वीज कनेक्शन कापले

By admin | Updated: December 7, 2014 00:23 IST

राज्यातील १९,०६९ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे.

महावितरणची मोहीम : ४३३ शेतकऱ्यांना फटकाकमल शर्मा - नागपूरराज्यातील १९,०६९ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे. परंतु आश्वासनानंतरही नागपूर जिल्ह्यातील शेतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. विभागातील सहा जिल्ह्यातील २०२९ गावांची पैसेवारी ५० पैशाहून कमी आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांचा समावेश आहे. वर्धा १०४९, चंद्रपूर ४४२ तर भंडारा जिल्ह्यातील ७ गावांचा यात समावेश आहे. दुष्काळग्रस्त गावांना सरकारकडून सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यानुसार चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. दुसरीकडे महावितरणने मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यात वसुलीसाठी ४३३ शेतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ओलिताचा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यात ७६,००० कृषिपंप जोडण्या असून, ८७ कोटींची थकबाकी आहे. यातील १२ एप्रिल ते १४ जूनदरम्यान ५३ कोटींची वसुली करण्यात आली. शासन निर्देशानंतरही वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. विभागातील सर्वच जिल्ह्यातील कृषिपंपांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. यात चंद्रपूर ११.५४ कोटी, गडचिरोली ८.५१, वर्धा ५०. ५२, गोंदिया ६.९३ व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे २०.७१ कोटींची थकबाकी आहे.महावितरणचा वसुलीवर जोरमागील थकबाकी वसुलीसाठी नव्हे तर चालू बिल भरण्याचा आग्रह क रीत आहोत. ज्या गावातील पैसेवारी कमी आहे अशा गावात वसुलीची कार्यवाही नाही. शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली. ३० आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली. यात व्याजासोबतच मूळ बिलाच्या रकमेत सवलत देण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला नाही, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. केंद्रीय पथक येणारदुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक १४ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. १४ व १५ रोजी मराठवाडा आणि १६ व १७ डिसेंबरला विदर्भातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. १७ डिसेंंबरला पथक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चर्चा करणार आहे.