शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आधीच दुष्काळ, त्यात वीज कनेक्शन कापले

By admin | Updated: December 7, 2014 00:23 IST

राज्यातील १९,०६९ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे.

महावितरणची मोहीम : ४३३ शेतकऱ्यांना फटकाकमल शर्मा - नागपूरराज्यातील १९,०६९ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे. परंतु आश्वासनानंतरही नागपूर जिल्ह्यातील शेतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. विभागातील सहा जिल्ह्यातील २०२९ गावांची पैसेवारी ५० पैशाहून कमी आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांचा समावेश आहे. वर्धा १०४९, चंद्रपूर ४४२ तर भंडारा जिल्ह्यातील ७ गावांचा यात समावेश आहे. दुष्काळग्रस्त गावांना सरकारकडून सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यानुसार चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. दुसरीकडे महावितरणने मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यात वसुलीसाठी ४३३ शेतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ओलिताचा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यात ७६,००० कृषिपंप जोडण्या असून, ८७ कोटींची थकबाकी आहे. यातील १२ एप्रिल ते १४ जूनदरम्यान ५३ कोटींची वसुली करण्यात आली. शासन निर्देशानंतरही वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. विभागातील सर्वच जिल्ह्यातील कृषिपंपांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. यात चंद्रपूर ११.५४ कोटी, गडचिरोली ८.५१, वर्धा ५०. ५२, गोंदिया ६.९३ व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे २०.७१ कोटींची थकबाकी आहे.महावितरणचा वसुलीवर जोरमागील थकबाकी वसुलीसाठी नव्हे तर चालू बिल भरण्याचा आग्रह क रीत आहोत. ज्या गावातील पैसेवारी कमी आहे अशा गावात वसुलीची कार्यवाही नाही. शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली. ३० आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली. यात व्याजासोबतच मूळ बिलाच्या रकमेत सवलत देण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला नाही, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. केंद्रीय पथक येणारदुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक १४ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. १४ व १५ रोजी मराठवाडा आणि १६ व १७ डिसेंबरला विदर्भातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. १७ डिसेंंबरला पथक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चर्चा करणार आहे.