शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सोबत नेला बापूंच्या विचार आणि आचारांचा ठेवा

By admin | Updated: October 31, 2014 00:45 IST

श्रमदान, फावडे कशाला म्हणतात, मातीशी जुळलेले जीवन म्हणजे काय, याची फुसटशी कल्पना होती. हे जाणून घेण्याची जिज्ञासा कायम होती. बापंूच्या वास्तव्याने पुनीत सेवाग्राम आश्रमात

अन् आयुष्याला लाभला मातीचा गंध सेवाग्राम (जि.वर्धा) : श्रमदान, फावडे कशाला म्हणतात, मातीशी जुळलेले जीवन म्हणजे काय, याची फुसटशी कल्पना होती. हे जाणून घेण्याची जिज्ञासा कायम होती. बापंूच्या वास्तव्याने पुनीत सेवाग्राम आश्रमात त्यांचे विचार आणि आचार कळले. येथे आल्यानंतर लक्झरी आयुष्याला खऱ्या अर्थाने मातीचा गंध लाभला. हा विचार आणि आचारांचा ठेवा आयुष्याला नवी दिशा देणारा आहे, ही भावनिक आणि तेवढीच वैचारिक प्रतिक्रिया आहे, ऐतिहासिक शहर म्हणून प्रख्यात मध्यप्रदेशातील ग्लॉलियरच्या सिंधिया स्कूलच्या विद्यार्थ्यांची!२७ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सिंधिया स्कूलच्या श्रमसंस्कार शिबिराचा सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात गुरुवारी समारोप झाला. पुस्तकात आयुष्यातील चढ-उतार ऐकले आहेत. ते प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी माजी विद्यार्थी व नागपूरचे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शर्मा यांनी सेवाग्राम आश्रमात संस्कार शिबिर घेण्याबाबत सुचविले. शाळा व्यवस्थापनाने क्षणात ही सूचना मान्य केली.शिबिरात दहावीतील ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. येथे सर्व सोई-सुविधा मिळतील, असा सर्वसाधारण अंदाज या विद्यार्थ्यांचा होता. येथे आल्यानंतर आश्रमातील नियमाप्रमाणेच भोजन दिले जाईल, हे ऐकताच साऱ्यांचे चेहरे हिरमुसले. पण नाईलाज होता. येथील सात्विक भोजनाचा आस्वाद घेताच विद्यार्थ्यांचे चेहरे प्रफुल्लीत झाले आणि येथूनच या विद्यार्थ्यांचा प्रवास बापंूच्या विचारांनी सुरू झाला.चार दिवसांच्या कालावधीत या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच फावडे हातात घेऊन यात्री निवास परिसरात श्रमदान केले. मग, तळहातावर आलेल्या फोडाचीही तमा बाळगली नाही. त्या परिसराला नवे सौंदर्य बहाल केले. एका इमारतीच्या बांधकामातही स्वयंस्फूर्तीने हातभार लावला. दूरवर असलेली रेती दुसऱ्या माळ्यावर पोहोचविण्याची किमया या मुलांनी लिलया साधली. कुठे अस्वच्छता दिसली की, हे विद्यार्थी ते ठिकाण स्वत:हून स्वच्छ करू लागले. गोशाळेत जाऊन अनेकांनी गाईचे शेण उचलून खताच्या खड्ड्यात टाकले. आश्रम, शेती, गोशाळा आणि यात्री निवास परिसरात श्रमदान करून मातीशी असलेले नाते, श्रमाचे मूल्य, श्रमातून मिळणारा आनंद याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला. घरी आणि शाळेत अत्याधुनिक जीवन शैलीत जगत आलो आहोत. सामान्य जीवनाचे धडे बापंूच्या या आश्रमात प्रत्यक्ष घेता आले याचा आनंद परतताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.शिबिर प्रमुख रमेश शर्मा म्हणाले, सिंधिया स्कूलमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्र्थी शिक्षण घेताहेत. सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश त्यात आहे. बहुतांश विद्यार्थी उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. लक्झरी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले आहे. ते शिबिर पूर्ण करतील, याबाबत साशंकता होती. मात्र ते आश्रमात काही क्षणातच रूळले. बापूंचे जीवन व कार्य त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले, बापंूच्या कर्मभूमीत त्यांनी घालवलेले हे दिवस त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहे. पवनार आश्रम, दत्तपूर आदी ठिकाणाचे महत्त्वही या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीतून जाणून घेता आले. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)माजी विद्यार्थ्यांकडून कौतुकाची थापसिंधिया स्कूलच्या संस्कार शिबिराला शाळेचे माजी विद्यार्थी व नागपूरचे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शर्मा, प्रमोद मुनोत (नाहर), संदीप अग्रवाल, संजय अरोरा व प्रतिक मुनोत यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी चार दिवसांत श्रमदानातून केलेली कामे बघून त्यांनीही तोंडात बोटे घातली. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आजी आणि माजी विद्यार्थ्यांचा संवाद या निमित्ताने येथे घडून आला. ही मंडळी आपल्या क्षेत्रात मोठी आहेत. मात्र शाळेची ओढ कधीही कमी होत नाही, याचाच प्रत्यय त्यांनी व्यस्ततेतून वेळ काढून येथे भेट दिल्याने आला. त्यांनीही विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. सुरेश शर्मा म्हणाले, आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरी या ठिकाणी मात्र आम्हाला यांच्यात आम्ही दिसत आहोत. समानतेची शिकवण शाळेने आम्हाला दिली. समाजाचे दायित्व पण पाळण्याचे कर्तव्य शालेय संस्कारामुळे होत आहे. विद्यार्थी दशेत कशी धमाल करीत होतो याची आठवण ताजी झाली, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्यात.