शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीतील भूखंडांचे वाटप

By admin | Updated: February 17, 2016 03:18 IST

महाराष्ट्राने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठीची (डीएमआयसी) भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून, औद्योगिक भूखंडांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे

मनीष गजभिये ,  मुंबईमहाराष्ट्राने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठीची (डीएमआयसी) भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून, औद्योगिक भूखंडांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी मंगळवारी येथे दिली. ‘औद्योगिक कॉरिडॉर’वरील चर्चासत्रात ते बोलत होते. डीएमआयसी प्रकल्पातील राज्यांपुढे भूसंपादन हे सर्वात मोठे आव्हान आहे. तथापि, महाराष्ट्राने औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन येथे शेतकऱ्यांशी कोणताही संघर्ष न होऊ देता भूसंपादन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी स्वेच्छेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिल्या. सरकारनेही ‘रेडी रेकनर’ दराच्या पाच पट अधिक भाव त्यांना दिला. शेंद्रा-बिडकीन परिसरात सर्व चार हजार हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधा उभारण्याचे कंत्राट शापूरजी पालोनजी कंपनी लिमिटेडला देण्यात आले आहे. औद्योगिक भूखंडांची विक्री करण्याची प्रक्रिया एप्रिल-मेमध्ये सुरू होईल. सिंगापूरशी करारऔरंगाबाद हे पाणीटंचाई क्षेत्र आहे. त्यातच आगामी प्रकल्पांनाही पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून पाण्यावर प्रक्रिया व त्याचा फेरवापर यासंदर्भात सिंगापूर सरकारशी सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. सिंगापूर सरकार पालिकेला पाण्यावरील प्रक्रिया व पाण्याचा फेरवापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण लवकरच सुरू होईल, असेही चंद्रा म्हणाले. बंगळुरू-मुंबई आर्थिक कॉरिडॉर सोलापूर आणि कोल्हापूरच्या सुपीक जमिनीतून जात होता. त्यामुळे हा कॉरिडॉर तेथून ५० कि. मी. दूर सरकवून दुष्काळप्रवण भागातून नेण्याची तरतूद केली आहे. डीएमआयसी प्रकल्पाच्या अंमल बजावणीमुळे येत्या १५ ते २० वर्षांत औरंगाबाद औद्योगिक विकासात पुणे शहराच्याही पुढे जाईल. शेतकरी आता त्यांच्या जमिनी देण्यास तयार झाले असल्यामुळे सध्याच्या दराने जमिनी खरेदी करणे सुलभ झाले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासानंतर जमिनीचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे संपूर्ण डीएमआयसी प्रकल्पासाठी किती जमीन लागणार आहे याबाबत स्पष्टता असायला हवी, असे चंद्रा म्हणाले.