शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

युती एकवटली, विरोधक विखुरले

By admin | Updated: February 17, 2016 01:47 IST

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते

पालघर : दि. १६- २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्यातच बविआ, माकप, मनसे, बसपा यांचेही उमेदवारही रिंगणात होते. अशा स्थितीतही शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांनी ४६१५२ मते व ५१५ मतांचे अधिक्य मिळवून विजय मिळविला होता. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या गावितांना ४५६२७, भाजपाच्या डॉ. गौड यांना ३४१४९ तर बविआच्या मनिषा निमकर यांना २३७३८, माकपाच्या उमेदवाराला ६५००, मनसेला ३१४८, तर बसपाला १९०० मते मिळाली होती. या निकालाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन या पोटनिवडणुकीत भाजपाने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारून युतीच्या मतांची फाटाफूट टाळली होती. त्याचा फायदा युतीला म्हणजे अमित घोडा यांना झाला आणि त्यांचे मताधिक्य ५१५ वरून एकदम २०९८७ वर गेले. एकीकडे युतीची मते एकवटलेली असतांना काँग्रेसने मात्र बविआशी काही समझोता करून ही लढत एकास एक अशी सरळ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते न झाल्यामुळे युती विरोधातील मतांची फाटाफूट झाली. त्याचा परिणाम अमित घोडा यांची मते, मताधिक्य वाढून ते विजयी होण्यात झाला. निमकर जर या लढतीत नसत्या तर त्यांची ३६७८१ मते गावित आणि घोडा यांच्यात विभागली गेली असती अशा स्थितीत कोण विजयी झाले असते हे सांगता येणे कठिण झाले असते. परंतु तसे झाले नाही. १निमकर आणि गावित यांना आपली मते गत निवडणुकीच्या तुलनेत काहीशी वाढली. एवढ्यावरच यावेळी समाधान मानावे लागले आणि विजयश्रीने आपल्याला कशी हुलकावणी दिली ते ही पहावे लागले. जो राजकीय शहाणपणा सेना-भाजपाने दाखविला तो काँग्रेस आणि बविआने दाखविला असता तर या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. या निवडणुकीतील राजकीय व्यूहरचनेत काँग्रेस आणि बविआ कमी पडलेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये व्यक्त होते आहे. २गावित आणि निमकर यांनी जरी मते वाढल्याचा दावा केला असला तरी सत्तेच्या राजकारणात तुलनात्मक मतवाढीपेक्षा जयापजयाला अधिक महत्व असते. याचे भान युती विरोधकांनी राखले नाही. या निवडणुकीत मनसे आणि बविआ यांचे उमेदवार नव्हते. मार्क्सवादी काहीसे निष्प्रभ झालेले त्यामुळे सेना-भाजप, काँग्रेस बविआ हे चारच पक्ष प्रभावी होते. ३जशी सेना-भाजपने एकत्र येण्याची राजकीय धूर्तता दाखविली तशीच धूर्तता काँग्रेस आणि बविआने दाखविली असती तर निश्चितच या निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलले असते. या पुढच्या निवडणुकांत तरी अशी धूर्तता काँग्रेस दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.