शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

युती एकवटली, विरोधक विखुरले

By admin | Updated: February 17, 2016 01:47 IST

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते

पालघर : दि. १६- २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्यातच बविआ, माकप, मनसे, बसपा यांचेही उमेदवारही रिंगणात होते. अशा स्थितीतही शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांनी ४६१५२ मते व ५१५ मतांचे अधिक्य मिळवून विजय मिळविला होता. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या गावितांना ४५६२७, भाजपाच्या डॉ. गौड यांना ३४१४९ तर बविआच्या मनिषा निमकर यांना २३७३८, माकपाच्या उमेदवाराला ६५००, मनसेला ३१४८, तर बसपाला १९०० मते मिळाली होती. या निकालाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन या पोटनिवडणुकीत भाजपाने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारून युतीच्या मतांची फाटाफूट टाळली होती. त्याचा फायदा युतीला म्हणजे अमित घोडा यांना झाला आणि त्यांचे मताधिक्य ५१५ वरून एकदम २०९८७ वर गेले. एकीकडे युतीची मते एकवटलेली असतांना काँग्रेसने मात्र बविआशी काही समझोता करून ही लढत एकास एक अशी सरळ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते न झाल्यामुळे युती विरोधातील मतांची फाटाफूट झाली. त्याचा परिणाम अमित घोडा यांची मते, मताधिक्य वाढून ते विजयी होण्यात झाला. निमकर जर या लढतीत नसत्या तर त्यांची ३६७८१ मते गावित आणि घोडा यांच्यात विभागली गेली असती अशा स्थितीत कोण विजयी झाले असते हे सांगता येणे कठिण झाले असते. परंतु तसे झाले नाही. १निमकर आणि गावित यांना आपली मते गत निवडणुकीच्या तुलनेत काहीशी वाढली. एवढ्यावरच यावेळी समाधान मानावे लागले आणि विजयश्रीने आपल्याला कशी हुलकावणी दिली ते ही पहावे लागले. जो राजकीय शहाणपणा सेना-भाजपाने दाखविला तो काँग्रेस आणि बविआने दाखविला असता तर या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. या निवडणुकीतील राजकीय व्यूहरचनेत काँग्रेस आणि बविआ कमी पडलेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये व्यक्त होते आहे. २गावित आणि निमकर यांनी जरी मते वाढल्याचा दावा केला असला तरी सत्तेच्या राजकारणात तुलनात्मक मतवाढीपेक्षा जयापजयाला अधिक महत्व असते. याचे भान युती विरोधकांनी राखले नाही. या निवडणुकीत मनसे आणि बविआ यांचे उमेदवार नव्हते. मार्क्सवादी काहीसे निष्प्रभ झालेले त्यामुळे सेना-भाजप, काँग्रेस बविआ हे चारच पक्ष प्रभावी होते. ३जशी सेना-भाजपने एकत्र येण्याची राजकीय धूर्तता दाखविली तशीच धूर्तता काँग्रेस आणि बविआने दाखविली असती तर निश्चितच या निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलले असते. या पुढच्या निवडणुकांत तरी अशी धूर्तता काँग्रेस दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.