शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युती एकवटली, विरोधक विखुरले

By admin | Updated: February 17, 2016 01:47 IST

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते

पालघर : दि. १६- २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्यातच बविआ, माकप, मनसे, बसपा यांचेही उमेदवारही रिंगणात होते. अशा स्थितीतही शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांनी ४६१५२ मते व ५१५ मतांचे अधिक्य मिळवून विजय मिळविला होता. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या गावितांना ४५६२७, भाजपाच्या डॉ. गौड यांना ३४१४९ तर बविआच्या मनिषा निमकर यांना २३७३८, माकपाच्या उमेदवाराला ६५००, मनसेला ३१४८, तर बसपाला १९०० मते मिळाली होती. या निकालाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन या पोटनिवडणुकीत भाजपाने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारून युतीच्या मतांची फाटाफूट टाळली होती. त्याचा फायदा युतीला म्हणजे अमित घोडा यांना झाला आणि त्यांचे मताधिक्य ५१५ वरून एकदम २०९८७ वर गेले. एकीकडे युतीची मते एकवटलेली असतांना काँग्रेसने मात्र बविआशी काही समझोता करून ही लढत एकास एक अशी सरळ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते न झाल्यामुळे युती विरोधातील मतांची फाटाफूट झाली. त्याचा परिणाम अमित घोडा यांची मते, मताधिक्य वाढून ते विजयी होण्यात झाला. निमकर जर या लढतीत नसत्या तर त्यांची ३६७८१ मते गावित आणि घोडा यांच्यात विभागली गेली असती अशा स्थितीत कोण विजयी झाले असते हे सांगता येणे कठिण झाले असते. परंतु तसे झाले नाही. १निमकर आणि गावित यांना आपली मते गत निवडणुकीच्या तुलनेत काहीशी वाढली. एवढ्यावरच यावेळी समाधान मानावे लागले आणि विजयश्रीने आपल्याला कशी हुलकावणी दिली ते ही पहावे लागले. जो राजकीय शहाणपणा सेना-भाजपाने दाखविला तो काँग्रेस आणि बविआने दाखविला असता तर या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. या निवडणुकीतील राजकीय व्यूहरचनेत काँग्रेस आणि बविआ कमी पडलेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये व्यक्त होते आहे. २गावित आणि निमकर यांनी जरी मते वाढल्याचा दावा केला असला तरी सत्तेच्या राजकारणात तुलनात्मक मतवाढीपेक्षा जयापजयाला अधिक महत्व असते. याचे भान युती विरोधकांनी राखले नाही. या निवडणुकीत मनसे आणि बविआ यांचे उमेदवार नव्हते. मार्क्सवादी काहीसे निष्प्रभ झालेले त्यामुळे सेना-भाजप, काँग्रेस बविआ हे चारच पक्ष प्रभावी होते. ३जशी सेना-भाजपने एकत्र येण्याची राजकीय धूर्तता दाखविली तशीच धूर्तता काँग्रेस आणि बविआने दाखविली असती तर निश्चितच या निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलले असते. या पुढच्या निवडणुकांत तरी अशी धूर्तता काँग्रेस दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.