शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

युतीच्या डोक्यात सत्ता गेलीय

By admin | Updated: February 28, 2016 03:59 IST

सत्ताधारी भाजपा सरकारवर जनता नाराज असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून देशद्रोह व राष्ट्रभक्तीसारखे मुद्दे बाहेर काढले जात असल्याची टीका राष्ट्रवादी

मुंबई : सत्ताधारी भाजपा सरकारवर जनता नाराज असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून देशद्रोह व राष्ट्रभक्तीसारखे मुद्दे बाहेर काढले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. सत्ता येते व जाते, त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवायचे असतात. सत्तेची हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते, असा टोलाही या वेळी त्यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लगावला.मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. केंद्रात सत्ता असताना आणि मोठी पॅकेज जाहीर करूनही बिहारमध्ये आणि दिल्लीत भाजपाचा पराभव झाला. पंतप्रधान मोदींच्या लाख कोटींच्या आकड्यांना बिहारची जनता भुलली नाही. आगामी निवडणुका होत असलेल्या राज्यातही पराभव समोर दिसत असल्याने देशात दुहीची किंवा हिंदुत्ववादाची बीजे पेरून भाजपा निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खा. पवार यांनी केला.वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू असून, सत्तेच्या आधारे वेगळ्या विचारांच्या नेत्यांना संपवायचे काम सुरू आहे. सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे लोक पोलीस दलावर हल्ला करू लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.हिंदू विरुद्ध मुस्लीम, दलित विरुद्ध अदलित असे वाद निर्माण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यात पाणी नाही. सरकार लोकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाही. मग मराठवाड्यातली लोक जगणार कसे असा सवाल त्यांनी केला. गोमातेला वाचवा म्हणायचे, तिच्या नावाने राजकारण करायचे आणि गोमातेला चारा मात्र द्यायचा नाही, असे सांगत, या सरकारमध्ये गोमातेला चारा द्यायची दानत नसल्याची टीकाही खा.पवार यांनी केली.हैदराबाद विद्यापीठात देशविरोधी कारवाई करणारी टोळी आहे. असे सांगत केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी पत्र लिहून देशविरोधी वागणाऱ्यांवर कारवाई करा असे सांगितले. त्यानुसार रोहित वेमुला आणि त्याच्या मित्रांना होस्टेलमधून बाहेर काढले गेले शिष्यवृत्ती बंद करण्यात आली त्यामुळेच रोहितने आत्महत्या केली असा आरोपही पवार यांनी केला.मेक इन इंडियात जास्त गुंतवणूक मुंबई परिसरात आली. मुख्यमंत्री विदर्भात गुंतवणूक आणू शकले नाहीत., असे सांगत विरोधी पक्षात असताना विदर्भावर अन्याय झाला म्हणून ते ओरडायचे असा चिमटाही त्यांनी फडणवीस यांना काढला. मेक इन इंडियामध्ये सरकारची नियत चांगली नव्हती, नाही तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आग लागली नसती असा टोला त्यांनी लगावला.दोषींना पाठीशी घालणार नाही!परमार प्रकरणाबाबत शरद पवार पहिल्यांदा बोलले. ते म्हणाले, आमचा माणूस दोषी असेल तर मी पाठीशी घालणार नाही. पण परमार यांनी लिहिलेले पत्र सांगत आहे की, परमार आर्थिक अडचणीत होते म्हणून त्यांनी आत्महत्या केली. परमार यांच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवले तर त्यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे. हे सुडाचे राजकारण आहे.वेगळ्या विदर्भाच्या ठरावाला पाठिंबा देऊ वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याबाबत बोलताना खा. पवार म्हणाले, महाराष्ट्र एकसंघ राहावा, अशी माझी इच्छा आहे. परंतु वेगळा विदर्भ व्हावा ही तेथील लोकांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी तेथील लोकांच्या इच्छेआड येणार नाही. पण मूठभर लोकांची इच्छा असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. आणा वेगळ्या विदर्भाचा ठराव, आम्ही पाठिंबा देतो. पाहू या काय होते ते. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग अस्वस्थ आहे. आंदोलने केली की त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जातो. त्यामुळे पक्षाच्या विद्यार्थ्यांनी सावध व्हावे. सरकार तुमच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करेल, त्यामुळे तुम्ही त्याची तयारी ठेवा. - शरद पवार