शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

युती सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा!

By admin | Updated: July 16, 2017 00:41 IST

शिवसेना-भाजपाचे सरकार म्हणजे, गावात येणारा काळू-बाळूचा तमाशा आहे. हे सरकार एक नौटंकी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शिवसेना-भाजपाचे सरकार म्हणजे, गावात येणारा काळू-बाळूचा तमाशा आहे. हे सरकार एक नौटंकी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, हे अनेक उदाहरणांतून दिसून आले आहे. साखर मुबलक असतानाही पाच लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात असो की, तूर पिकवायला सांगून खरेदी न करणारे सरकार असो. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची, प्रत्यक्षात खरीप संपत चालला, तरी एक रुपयाही द्यायचा नाही, हीच सरकारची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारला शेतकरी देशोधडीला लावेल. दुर्दैवाने सरकारमध्ये असलेल्यांना शेतीचे काय कळते, असे म्हटले, तर त्यांना मिरच्या झोंबतील, असे त्यांनी सांगितले.‘समृद्धी’वरून टीकाशिवसेनेचे मंत्रिमंडळात बारा मंत्री आहेत, त्यांना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाची बैठक गाजवायला सांगा. समृद्धी महामार्गाचा विषय असो की, राष्ट्रपतिपदाची निवडणूक, उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यांचेच मंत्री एकनाथ शिंदे नागपुरात जाऊन समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांशी करार करतात, अशी टीका अजित पवार यांनी केली.हे सरकार गावा-गावांत येणाऱ्या काळू-बाळूच्या तमाशासारखे आहे. एकाने मारल्यासारखे करायचे अन् दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. १५ वर्षांनंतर यांची सत्ता आली आहे. ते मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणार नाहीत.- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री