शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

युती सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा!

By admin | Updated: July 16, 2017 00:41 IST

शिवसेना-भाजपाचे सरकार म्हणजे, गावात येणारा काळू-बाळूचा तमाशा आहे. हे सरकार एक नौटंकी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शिवसेना-भाजपाचे सरकार म्हणजे, गावात येणारा काळू-बाळूचा तमाशा आहे. हे सरकार एक नौटंकी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, हे अनेक उदाहरणांतून दिसून आले आहे. साखर मुबलक असतानाही पाच लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात असो की, तूर पिकवायला सांगून खरेदी न करणारे सरकार असो. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची, प्रत्यक्षात खरीप संपत चालला, तरी एक रुपयाही द्यायचा नाही, हीच सरकारची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारला शेतकरी देशोधडीला लावेल. दुर्दैवाने सरकारमध्ये असलेल्यांना शेतीचे काय कळते, असे म्हटले, तर त्यांना मिरच्या झोंबतील, असे त्यांनी सांगितले.‘समृद्धी’वरून टीकाशिवसेनेचे मंत्रिमंडळात बारा मंत्री आहेत, त्यांना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाची बैठक गाजवायला सांगा. समृद्धी महामार्गाचा विषय असो की, राष्ट्रपतिपदाची निवडणूक, उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यांचेच मंत्री एकनाथ शिंदे नागपुरात जाऊन समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांशी करार करतात, अशी टीका अजित पवार यांनी केली.हे सरकार गावा-गावांत येणाऱ्या काळू-बाळूच्या तमाशासारखे आहे. एकाने मारल्यासारखे करायचे अन् दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. १५ वर्षांनंतर यांची सत्ता आली आहे. ते मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणार नाहीत.- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री