शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तीशी युती सरकार बांधील

By admin | Updated: January 10, 2015 00:50 IST

चंद्रकांत पाटील : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी अनेक अडचणी, तरीही सोडवणारच

कोल्हापूर : स्व. गोपीनाथ मुंडे यांचे महाराष्ट्र टोलमुक्तीच्या स्वप्नाशी राज्यातील युतीचे सरकार बांधील आहे. वेळ लागेल; पण टोलबाबत योग्य निर्णय होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूरचा टोल ‘आयआरबी’ सहजासहजी सोडणार नाही. अडचणी अनेक आहेत; तरीही हा प्रश्न सोडवणारच, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. मंत्री पाटील म्हणाले, राज्यात पंधरा-पंधरा वर्षांचे जटील विषय आहेत. सरकार येऊन जेमतेम ६९ दिवस झाले. प्रश्न सोडविण्यासाठी थोडा वेळ लागणारच. टोलबाबत सरकारने काही निर्णय घेतला की कंपनी थेट न्यायालयात जाते. खारघरचा टोल बंदचा निर्णय घेतला. कंपनी न्यायालयात गेली; त्यामुळे तो पुन्हा सुरू झाला. मग न्यायालयाचा अवमान करायचा का? १२३ ठिकाणी टोलप्रश्न आहे. एक-एक करीत टोल घेऊन त्यांचा करार, मुदतीची माहिती घेऊन प्रश्न मार्गी लावू. सरकारपुढे केवळ टोलचा प्रश्न नाही. दुष्काळग्रस्तांसाठीचे पॅकेज, साखर कारखानदारांसह इतर प्रश्नही आहेत. अवजड वाहनांकडून जादा टोल घेऊन चारचाकींना वगळण्याचे धोरण केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सहा सी.एं. (चार्टर्ड अकौंटट)ची कमिटी नेमली असून, त्यांच्यामार्फत टोलच्या भौगोलिक कार्यक्षेत्राचा अभ्यास करून मुदत पूर्ण होत आलेले टोलनाके बंद करताना किती रक्कम संबंधित कंपनीला द्यावी लागणार, याचा अहवाल मागविला आहे. टोलबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांची बांधकाम विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या टोलचा पेच आहे. २२० कोटी प्रकल्पाच्या खर्चाला मान्यता आहे; पण ‘आयआरबी’ कंपनी ४०० कोटी खर्च केल्याचा दावा करीत आहे. वाढीव खर्चाची मान्यता यांसह विविध मुद्द्यांवर कंपनी भांडणार आहे. यातून मार्ग काढावा लागणार आहे. ‘अडत’बाबत गुरुवारी बैठकअडत्या जोखीम घेऊन शेतकऱ्यांना पैसे, तर व्यापाऱ्यांना माल देतो. त्यामुळे त्याला अडत दिली पाहिजे; पण ती कशी देता येईल, याबाबत वाशी बाजार समितीमधील अडत्यांशी चर्चा केली आहे. पुणे, नाशिक समित्यांमध्येही जाणार आहे. याबाबत गुरुवारी (दि. १५) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय होणार हे माहीत असल्याने लगेच २१ जानेवारीची बैठक बोलावली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. काँगे्रसचे सरकार पळपुटे !कॉँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या घोषणांची आम्ही पूर्तता करीत आहोत. राज्यावर ३ लाख ८४ हजार कोटींचे कर्ज करून कॉँग्रेस पळून गेली आहे; पण आम्ही पळ काढणारे नाही. यातून मार्ग काढून दिलेली आश्वासने पूर्ण करू, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.