शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

युती-आघाडीत संशयकल्लोळ!

By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST

सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीमध्ये आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये किती संशयकल्लोळ आहे, त्याचे उघड दर्शन महाराष्ट्राला घडले.

मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीमध्ये आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये किती संशयकल्लोळ आहे, त्याचे उघड दर्शन महाराष्ट्राला घडले.राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर तत्कालीन सभापती प्रा. ना. स. फरांदे यांना पदावरून दूर न करण्याचा निर्णय घेतला होता, याकडे लक्ष वेधत माणिकराव ठाकरे म्हणाले, की सभापतीपद मिळवण्याकरिता आमचा मित्रपक्ष कुठल्याही तडजोडीला तयार झाला असून, आता त्याची भूमिका विरोधी पक्षाची राहिलेली नाही. यापूर्वी निकालाअगोदर आमच्या मित्राने भाजपा सरकारला पाठिंबा देऊ केला होता. भविष्यात आमच्या मित्रपक्षाची रा.स्व. संघ व भाजपासोबत आघाडी होणार आहे, सांगताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत माणिकराव तुम्हीही एक दिवस कंटाळून संघात याल, अशी टिप्पणी केली. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणात भाजपावर येथेच्छ टीका केली. ते म्हणाले, ‘मूंह में राम, बगल में छुरी’ असे भाजपाचे धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साटेलोटे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला गेले व शरद पवार यांचा सल्ला घेऊन काम करतो, असे म्हणाले. एका मराठी माणसाचा सल्ला घेऊन काम सुरू असल्याचे ऐकून आनंद झाला, असा टोला कदम यांनी लगावला. त्यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बाळासाहेब व पवार यांची गाढ मैत्री पाहून त्या वेळी आमचा मेंदू थंड झाला होता का, अशी कोपरखळी मारली. त्यालाही कदम यांनी उत्तर देत ‘पण त्या मैत्रीत कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसत नव्हता’, असा शेलका वार केला. आमचे मेंदू शाबूत असून, ज्यांच्या मेंदूत बिघाड झालाय त्यांनी तो दुरुस्त करावा, असेही ते बोलले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट उठले आणि कुणाचा मेंदू कुणी तपासायचा ते काळ ठरवेल, असा चिमटा कदम यांना काढला. कदम यांना शिवसेनेत काय चालले ते कळत नाही; त्यामुळे सभागृहात काय चालले आहे ते कसे कळणार, अशी पुस्तीही बापट यांनी जोडली. कदम यांनी आपला मोर्चा उपसभापती वसंत डावखरे यांच्याकडे वळवत उद्या तुमच्यावरही पद गमावण्याची वेळ येणार असल्याचा इशारा दिला. त्यावर ‘माझी इज्जत स्वत:वर अवलंबून असून खुर्चीवर नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतोे, ‘मी आपला मित्र आहे माझी इज्जत जाऊ देणार नाही’, असे डावखरे यांनी सुनावताच सभागृहात हशा पिकला.राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, की आमचा पंढरपूरच्या विठ्ठलावर राग नाही तर त्यांच्या सभोवतीच्या बडव्यांवर आहे. या बडव्यांनी बदसल्ला दिल्याने आम्ही सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणला. सत्ता हेच आमचे उद्दिष्ट असते तर १९९९ साली केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सामील झालो असतो. एखाद्या ठरावावर कुणी समर्थन दिले म्हणजे त्या पक्षांचे जुळले, असे होत नाही. राधाकृष्णा विरोधी पक्षनेते पदासाठी तू कुठे कुठे गेला, कुणाकुणाला भेटला तेव्हा कुठे गेला तुझा सेक्युलर धर्म, असा सवालही तटकरे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)आपल्यावर तीन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला हे खरे आहे. मात्र तिन्ही वेळा तो आपल्या अनुपस्थितीत चर्चेला न घेण्याचा निर्णय घेतला गेला. आताही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला आपण तयार आहोत. चौकशीत दोषी आढळलो तर सभागृह सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, अशा शब्दांत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्यावरील टीकेला आव्हान दिले. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात रामाने बाण मारायची गरज नव्हती, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. आकड्याची सोंगटी फेकून सारीपाटावर अप्रतिष्ठेचे गणित जुळवण्याच्या या प्रकाराचा आपल्याला खेद वाटतो, असा हल्ला त्यांनी राष्ट्रवादीवर केला.