शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीत संशयकल्लोळ!

By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST

सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीमध्ये आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये किती संशयकल्लोळ आहे, त्याचे उघड दर्शन महाराष्ट्राला घडले.

मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीमध्ये आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये किती संशयकल्लोळ आहे, त्याचे उघड दर्शन महाराष्ट्राला घडले.राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर तत्कालीन सभापती प्रा. ना. स. फरांदे यांना पदावरून दूर न करण्याचा निर्णय घेतला होता, याकडे लक्ष वेधत माणिकराव ठाकरे म्हणाले, की सभापतीपद मिळवण्याकरिता आमचा मित्रपक्ष कुठल्याही तडजोडीला तयार झाला असून, आता त्याची भूमिका विरोधी पक्षाची राहिलेली नाही. यापूर्वी निकालाअगोदर आमच्या मित्राने भाजपा सरकारला पाठिंबा देऊ केला होता. भविष्यात आमच्या मित्रपक्षाची रा.स्व. संघ व भाजपासोबत आघाडी होणार आहे, सांगताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत माणिकराव तुम्हीही एक दिवस कंटाळून संघात याल, अशी टिप्पणी केली. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणात भाजपावर येथेच्छ टीका केली. ते म्हणाले, ‘मूंह में राम, बगल में छुरी’ असे भाजपाचे धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साटेलोटे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला गेले व शरद पवार यांचा सल्ला घेऊन काम करतो, असे म्हणाले. एका मराठी माणसाचा सल्ला घेऊन काम सुरू असल्याचे ऐकून आनंद झाला, असा टोला कदम यांनी लगावला. त्यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बाळासाहेब व पवार यांची गाढ मैत्री पाहून त्या वेळी आमचा मेंदू थंड झाला होता का, अशी कोपरखळी मारली. त्यालाही कदम यांनी उत्तर देत ‘पण त्या मैत्रीत कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसत नव्हता’, असा शेलका वार केला. आमचे मेंदू शाबूत असून, ज्यांच्या मेंदूत बिघाड झालाय त्यांनी तो दुरुस्त करावा, असेही ते बोलले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट उठले आणि कुणाचा मेंदू कुणी तपासायचा ते काळ ठरवेल, असा चिमटा कदम यांना काढला. कदम यांना शिवसेनेत काय चालले ते कळत नाही; त्यामुळे सभागृहात काय चालले आहे ते कसे कळणार, अशी पुस्तीही बापट यांनी जोडली. कदम यांनी आपला मोर्चा उपसभापती वसंत डावखरे यांच्याकडे वळवत उद्या तुमच्यावरही पद गमावण्याची वेळ येणार असल्याचा इशारा दिला. त्यावर ‘माझी इज्जत स्वत:वर अवलंबून असून खुर्चीवर नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतोे, ‘मी आपला मित्र आहे माझी इज्जत जाऊ देणार नाही’, असे डावखरे यांनी सुनावताच सभागृहात हशा पिकला.राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, की आमचा पंढरपूरच्या विठ्ठलावर राग नाही तर त्यांच्या सभोवतीच्या बडव्यांवर आहे. या बडव्यांनी बदसल्ला दिल्याने आम्ही सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणला. सत्ता हेच आमचे उद्दिष्ट असते तर १९९९ साली केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सामील झालो असतो. एखाद्या ठरावावर कुणी समर्थन दिले म्हणजे त्या पक्षांचे जुळले, असे होत नाही. राधाकृष्णा विरोधी पक्षनेते पदासाठी तू कुठे कुठे गेला, कुणाकुणाला भेटला तेव्हा कुठे गेला तुझा सेक्युलर धर्म, असा सवालही तटकरे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)आपल्यावर तीन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला हे खरे आहे. मात्र तिन्ही वेळा तो आपल्या अनुपस्थितीत चर्चेला न घेण्याचा निर्णय घेतला गेला. आताही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला आपण तयार आहोत. चौकशीत दोषी आढळलो तर सभागृह सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, अशा शब्दांत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्यावरील टीकेला आव्हान दिले. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात रामाने बाण मारायची गरज नव्हती, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. आकड्याची सोंगटी फेकून सारीपाटावर अप्रतिष्ठेचे गणित जुळवण्याच्या या प्रकाराचा आपल्याला खेद वाटतो, असा हल्ला त्यांनी राष्ट्रवादीवर केला.